शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा मोठा निर्णय; डॅमेज कंट्रोल सुरू
2
WI vs AFG Live : पूरनचे थोडक्यात शतक हुकले! विडिंजने रूद्रावतार दाखवला; अफगाणिस्तानची धुलाई
3
आजचे राशीभविष्य, १८ जून २०२४ : कर्कसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
पाकिस्तानच्या कोचने खेळाडूंचे वाभाडे काढले; इंग्लंडच्या दिग्गजाने जखमेवर मीठ चोळले
5
महायुतीत तिसरा मित्र नको म्हणणाऱ्यांना भाजपमध्ये बळ; आकडेवारीने वाढवली अजित पवारांची डोकेदुखी!
6
मराठा विद्यार्थ्यांसाठीची कर्ज योजना कागदावरच; वर्षानंतरही अंमलबजावणी नाही!
7
लोकसभा अध्यक्षपद भाजपकडेच?; 'या' महिला नेत्याचे नाव स्पर्धेत आघाडीवर
8
...तर मी ओबीसींच्या आंदोलनात पुन्हा उतरेन; मंत्री छगन भुजबळांचा सरकारला इशारा
9
आजचा अग्रलेख: संशयकल्लोळ..!
10
गणपती स्पेशल जादा गाड्या सोडा; अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी
11
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
12
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
13
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
14
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
15
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
16
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
17
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
18
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
19
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
20
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले

उल्हास नदीवरील पूल झाला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:17 AM

वांगणीहून कारावगावाकडे रस्ता : फलक लावूनही वाहतूक सुरू, ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास

बदलापूर : वांगणी स्टेशनवरून पुढे वांगणी गावातून काराव व पुढील अन्य गावांकडे जाताना वाटेत उल्हास नदीवर असलेला पूल १९९८-९९ दरम्यान अंबरनाथचे तत्कालीन आमदार व मंत्री साबीर शेख यांच्या पुढाकाराने बांधण्यात आला होता. हा पूल आता मोडकळीस आला आहे. राज्य सरकारच्या बांधकाम खात्यानेच तो धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढून तसे फलक काही महिन्यांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूंनी लावलेले आहेत.

हा पूल अरुंद असून एकाचवेळी समोरासमोरून येणाऱ्या चारचाकी व अन्य वाहनांच्या चालकांना वाहने खूपच खबरदारीने चालवावी लागतात. सरकारने पूल धोकादायक असल्याचे जाहीर करूनही व त्यावरून अवजड वाहनांना जाण्यास मनाई करणारे फलक सात ते आठ महिन्यांपूर्वी लावले. पण, आजही या धोकादायक पुलावरून अगदी सहाचाकी ट्रक्स, कॉलेजला विद्यार्थ्यांची नेआण करणाºया बस, इतर चारचाकी खासगी वाहने, रिक्षा, दुचाकी वाहने सर्रास नेली जातात. वांगणीहून काराव व आजूबाजूच्या व पुढील गावांना जाण्यासाठी जवळचा व सोयीस्कर अन्य रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे लोक जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करत आहेत.

सरकारनेच धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या या पुलावर केव्हाही दुर्घटना घडू शकते, याकडे संबंधित खाते, प्रशासन, ग्रामस्थ, प्रवास करणारे अन्य सर्वच डोळेझाक करत आहेत. या पुलावरून अहोरात्र सर्रास अवजड व अन्य वाहने चालवली जातात. प्रशासनाने तातडीने ही वाहतूक थांबवावी अशी मागणी होत आहे.

पर्यायी पूल बांधण्याची मागणीउल्हास नदीवरील या पुलाला पर्यायी मोठा व रुंद पूल बांधण्यात यावा, तोपर्यंत वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, वांगणी- काराव रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी वांगणी, काराव व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वांगणी-काराव रस्त्याची दुरवस्थावांगणी स्टेशन, गाव येथून काराव गावाला जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकी, रिक्षा व सर्व चारचाकी वाहने जातात व मोठी वाहतूक दिवसरात्र होत असते. हा रस्ता मोठ्या चढउतारांचा, खड्डे व खाचखळग्यांनी भरलेला आहे. या रस्त्याचे रूंदीकरण, काँक्रिटीकरण होण्याची आवश्यकता आहे.