शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उत्तरप्रदेशातून पळालेल्या दोन अल्पवयीन मुली मिळाल्या ठाणे रेल्वे स्थानकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 00:57 IST

उत्तरप्रदेशातील घरातून पळून आलेल्या १४ आणि १७ वर्षीय दोन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांना यश आले. रेल्वे पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल दोन्ही मुलींच्या पालकांनी तसेच उत्तरप्रदेश पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा पालकांच्या स्वाधीनकुटूंबावरील रागातून सोडले घर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उत्तरप्रदेशातील घरातून पळून आलेल्या १४ आणि १७ वर्षीय दोन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांना यश आले. ठाण्यातील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल बाजूकडील पादचारी (एफओबी ) पूलावर संशयास्पदरित्या फिरतांना त्या गरुवारी पहाटेच्या सुमारास आढळल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर हा प्रकार समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) पोलीस उपनिरीक्षक नविन सिंह, उपनिरीक्षक सोनालीर मलैया आणि जमादार हंसवती भालावी हे गुरुवारी ठाण्यातील सीएसटीच्या दिशेकडील पादचारी पूलावरुन १२ आॅगस्ट रोजी २ वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. त्याच वेळी या पुलावर त्यांना ही १४ वर्षीय मुलगी संशयास्पदरित्या आढळली. चौकशीत तिने या पथकाला कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच तिच्याकडे प्रवासाचे तिकीटही नव्हते. तिला विश्वासात घेत ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात आणून पुन्हा तिची चौकशी केली. तिने शालीनी वर्मा (१४, रा. चौराचोरी, गोरखपूर, उत्तरप्रदेश, नावात बदल आहे.) अशी ओळख सांगितली. तिची माहिती गोरखपूर येथील कुटूंबीयांना सिंग यांच्या पथकाने दिली. ती कुशीनगर येथून गोरखपूर लोकमान्य टिळक या रेल्वेने मुंबईकडे आल्याचेही तिने कबूल केले. तिच्या कुटूंबीयांशी संपर्क केल्यानंतर तिच्या अपहरणाबाबत चोराचौरी पोलीस ठाण्यात गोरखपूर येथे तक्रार दाखल केल्याचीही बाब तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबईतील मुलूंड येथील तिच्या आत्याकडे ओळख पटवून या पथकाने तिला सुपूर्द केले. व्हिडिओ कॉलिंगद्वारे तिच्या वडिलांनी तिच्याशी संवादही साधला. हे कुटूंब पूर्वी ठाण्यात वास्तव्याला होते. त्यामुळे वडिलांशी कौटूंबिक कारणावरुन रागावल्याने तिने ठाण्यात पळून येण्याचा निर्णय घेतला होता.*दरम्यान, याच रेल्वेने आलेली अन्यही एक १७ वर्षीय मुलगी याच पथकाला फलाट क्रमांक दोनवर संशयास्पदरित्या गुरुवारी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. वडिलांचा शिक्षणाला विरोध असल्याने आपण पळून आल्याचा दावा तिने चौकशीदरम्यान केला. तिलाही तिच्या ऐरोली येथील चुलत भावाकडे ओळख पटवून या पथकाने सुपूर्द केले. रेल्वे पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल दोन्ही मुलींच्या पालकांनी तसेच उत्तरप्रदेश पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं