शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

उत्तरप्रदेशातून पळालेल्या दोन अल्पवयीन मुली मिळाल्या ठाणे रेल्वे स्थानकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 00:57 IST

उत्तरप्रदेशातील घरातून पळून आलेल्या १४ आणि १७ वर्षीय दोन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांना यश आले. रेल्वे पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल दोन्ही मुलींच्या पालकांनी तसेच उत्तरप्रदेश पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा पालकांच्या स्वाधीनकुटूंबावरील रागातून सोडले घर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उत्तरप्रदेशातील घरातून पळून आलेल्या १४ आणि १७ वर्षीय दोन मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांना यश आले. ठाण्यातील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल बाजूकडील पादचारी (एफओबी ) पूलावर संशयास्पदरित्या फिरतांना त्या गरुवारी पहाटेच्या सुमारास आढळल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर हा प्रकार समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) पोलीस उपनिरीक्षक नविन सिंह, उपनिरीक्षक सोनालीर मलैया आणि जमादार हंसवती भालावी हे गुरुवारी ठाण्यातील सीएसटीच्या दिशेकडील पादचारी पूलावरुन १२ आॅगस्ट रोजी २ वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. त्याच वेळी या पुलावर त्यांना ही १४ वर्षीय मुलगी संशयास्पदरित्या आढळली. चौकशीत तिने या पथकाला कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच तिच्याकडे प्रवासाचे तिकीटही नव्हते. तिला विश्वासात घेत ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात आणून पुन्हा तिची चौकशी केली. तिने शालीनी वर्मा (१४, रा. चौराचोरी, गोरखपूर, उत्तरप्रदेश, नावात बदल आहे.) अशी ओळख सांगितली. तिची माहिती गोरखपूर येथील कुटूंबीयांना सिंग यांच्या पथकाने दिली. ती कुशीनगर येथून गोरखपूर लोकमान्य टिळक या रेल्वेने मुंबईकडे आल्याचेही तिने कबूल केले. तिच्या कुटूंबीयांशी संपर्क केल्यानंतर तिच्या अपहरणाबाबत चोराचौरी पोलीस ठाण्यात गोरखपूर येथे तक्रार दाखल केल्याचीही बाब तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मुंबईतील मुलूंड येथील तिच्या आत्याकडे ओळख पटवून या पथकाने तिला सुपूर्द केले. व्हिडिओ कॉलिंगद्वारे तिच्या वडिलांनी तिच्याशी संवादही साधला. हे कुटूंब पूर्वी ठाण्यात वास्तव्याला होते. त्यामुळे वडिलांशी कौटूंबिक कारणावरुन रागावल्याने तिने ठाण्यात पळून येण्याचा निर्णय घेतला होता.*दरम्यान, याच रेल्वेने आलेली अन्यही एक १७ वर्षीय मुलगी याच पथकाला फलाट क्रमांक दोनवर संशयास्पदरित्या गुरुवारी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. वडिलांचा शिक्षणाला विरोध असल्याने आपण पळून आल्याचा दावा तिने चौकशीदरम्यान केला. तिलाही तिच्या ऐरोली येथील चुलत भावाकडे ओळख पटवून या पथकाने सुपूर्द केले. रेल्वे पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल दोन्ही मुलींच्या पालकांनी तसेच उत्तरप्रदेश पोलिसांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं