शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

विद्यार्थ्यांसोबतच आता पालकांचीही घेणार शिकवणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:23 AM

अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही.

- स्नेहा पावसकरठाणे : अनेक पालक आपल्या पाल्याला खाजगी शिकवणीत पाठवतात. त्या शिकवणीची फी भरणे सगळ्यांनाच परवडत नाही. त्यासाठी पालक दुप्पट मेहनत करून मुलांना शिकवणीत प्रवेश घेतात. मध्यमवर्गीय पालकांची हीच परवड थांबवण्याच्या दृष्टीने सरस्वती मंदिर ट्रस्टने यंदा शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सरस्वती विद्यासंकुलातच विनामूल्य शिकवणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा, यादृष्टीने पालकांचीही शिकवणी घेतली जाणार आहे.बहुतांशी शाळांमधील सुमारे ९० टक्के विद्यार्थी खाजगी शिकवणीत जातात. अगदी शिशुवर्गातील मुलेही शिकवणीत दिसतात. त्याची कारणे वेगवेगळी असतात. काही पालकांना योग्य तितके ज्ञान नसते. काहींना मुलांसाठी वेळ नसतो. काहींच्या वस्तीमधील वातावरण अभ्यासाला पोषक नसते, तर इतर मुले जातात म्हणूनही काही पालक मुलांना शिकवणीमध्ये पाठवतात. त्यातच खाजगी शिकवण्यांची फी वर्षागणिक वाढते आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांचे आर्थिक गणित कोलमडते. आपल्या शाळेतील बहुतांशी विद्यार्थीसुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, हे लक्षात घेत सरस्वती मंदिर ट्रस्टने शिकवणीमुक्त शाळा अभियान हाती घेतले आहे. या अभियानादरम्यान सुरुवातीला पहिली ते चौथी इयत्तेतील इच्छुक विद्यार्थ्यांची शाळेतील निवडक शिक्षक हे शाळेतच शिकवणी घेणार आहेत. शाळा सुटल्यावर किंवा आठवड्यातून शनिवार-रविवारी हे शिकवणीचे वर्ग घेतले जातील.इच्छुक पालकांनी नाोंदणी केल्यावर जुलै महिन्यापासूनच हे अभियान सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये सुरू होणार आहे, अशी माहिती संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिली.>घरच्या घरी अभ्यास घेण्याच्या क्लृप्त्या शिकवणारबदलत्या अभ्यासक्रमामुळे काही शिक्षित पालकही मुलांचा घरी अभ्यास घेणे टाळतात. अशा पालकांचीही शाळेत विशेष शिकवणी घेतली जाणार आहे. मुलांचा अभ्यास घरच्या घरी घेण्याच्या काही क्लृप्त्या, नियम त्यांना यादरम्यान समजावून सांगितले जाणार आहे.हे अभियान संस्था, शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित सहभागातूनच यशस्वी होऊ शकते. पहिल्या टप्प्यातच सगळे विद्यार्थी खाजगी शिकवणीपासून दूर होणार नाहीत. मात्र, शक्य तितक्या जास्त विद्यार्थ्यांना शाळाबाह्यशिकवण्यांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न असणार आहे.