शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

औरंगाबादमध्ये मिळाला ठाण्यातून चोरीस गेलेला १५ लाखांचा ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:45 PM

ठाण्यातून चोरीस गेलेल्या एका ट्रकला औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथून ताब्यात घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. ट्रकला असलेल्या जीपीएसमुळे ही चोरी पकडली गेली. मात्र, पोलीस मागावर असल्याचे समजल्यामुळे चोरटयाने मात्र पोबारा केला.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कामगिरीचोरटयाची हुलकावणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील माजीवडा भागातील मुंबई नाशिक मार्गावरुन चोरीस गेलेला १५ लाखांचा ट्रक औरंगाबाद जिल्हयातील वैजापूर येथील एका ढाब्यावरुन आणण्यात कापूरबावडी पोलिसांना यश आले आहे. या ट्रकच्या चोरटयाने मात्र पोलिसांना हुलकावणी दिली आहे. त्याचा अद्यापही शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.या ट्रकचे चालक बंधू भाटकर यांनी १७ आॅक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई -नाशिक राष्ट्रीय मार्गावरील माजीवडा उड्डाणपूलाच्याजवळ हा ट्रक उभा केला होता. १८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते ट्रकजवळ गेले. तेंव्हा तिथून ट्रक चोरीस गेल्याचे आढळले. याप्रकरणी भाटकर यांनी तात्काळ कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने या चोरीचा तपास सुरु केला. तेंव्हा ट्रकला असलेल्या जीपीएस यंत्रणेच्या आधारे तो औरंगाबाद जिल्हयातील वैजापूरपासून जवळच असलेल्या एका ढाब्याच्या ठिकाणी उभा असल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी वैजापूर पोलिसांच्या मदतीने हा ट्रक १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतला. मात्र, ट्रक चोरी करणाऱ्याने तिथून पलायन केले होते. हा ट्रक आता मुळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ट्रकची चोरी करणाºयाचा मात्र अजूनही शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी