शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, मोठा अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 10:18 IST

आगीवर वेळीच नियंत्रण; मोठे अनर्थ टळले

ठळक मुद्देहरी ओम रोडवाईस मालकीचा ट्रक असून तो ट्रक त्यावरील चालक मनोहर जाधव हे शनिवारी पहाटे उरण येथून तब्बल २९४ घरगुती भारत पेट्रोलियमचे गॅस सिलिंडर भरून नालासोपारा येथे निघाले होते

ठाणे : घरगुती गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी ठाण्यातील कळवा-विटावा परिसरात घडली. सुदैवाने, वेळीच ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आल्याने स्थानिक आणि तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

हरी ओम रोडवाईस मालकीचा ट्रक असून तो ट्रक त्यावरील चालक मनोहर जाधव हे शनिवारी पहाटे उरण येथून तब्बल २९४ घरगुती भारत पेट्रोलियमचे गॅस सिलिंडर भरून नालासोपारा येथे निघाले होते. नवी मुंबई मधून ठाणे मार्गे जाताना जाधव हे ट्रक कळवा-विटावा येथून विटावा रेल्वे ब्रीज खालून जाण्यापूर्वी त्यांना ट्रकच्या इंजिनमधून धूर येत असल्याची बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने रस्त्याच्या बाजूला ट्रक थांबवून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला माहिती दिली. त्यानुसार, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत, त्या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठे अनर्थ टाळण्यात अग्निशमन दलाला यश आले. 

घटनेची माहिती मिळताच आपत्ती कक्ष कर्मचारी, पोलीस यांनी धाव घेतली होती. तसेच यावेळी एक फायर इंजिन आणि एक रेस्क्यू गाडीला पाचारण केले होते. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सिलेंडर ट्रकला आग लागल्याचे समजता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटनेवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलthaneठाणे