शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

ठाण्यात ३८ ठिकाणी ‘तळी’, घोडबंदर मार्गावर वाहतूक मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:33 AM

शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी चौथ्या दिवशीदेखील दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सुमारे ३८ भागात पाणी साचले होते.

ठाणे - शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारी चौथ्या दिवशीदेखील दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील सुमारे ३८ भागात पाणी साचले होते. तर सकाळी भरतीची वेळी तो जोरदार बरसल्याने त्याचा परिणाम होऊन अनेक भागात पाणी शिरले.घोडबंदर मार्गावर पुन्हा त्याचठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला होता. दुपारनंतर मात्र ने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव ठाणे महापालिका प्रशासनासह जिल्हा परिषदेनेदेखील आपल्या शाळांना सुट्टी जाहीर केली. तर खाजगी शाळांना आपल्या जबाबदारीवर पाल्यांना शाळेत सोडावे, अशी भूमिका घेतली होती. राबोडी भागात कब्रस्तानची भिंत पडल्याने पाच वाहनांचे नुकसान झाले. तर शहराच्या विविध भागात वृक्ष उन्मळून पडल्याचे दिसून आले. तर याच पावसात साकेत पुलाच्या रस्त्याला तडे गेल्याने येथील वाहतुकीचा वेगही मंदावला होता.सोमवारी रात्री आणि मध्यरात्रीनंतर पावसाने उसंत घेतली नाही. ठाण्यात सोमवारी मध्यरात्री पर्यंत १०४.३६ मिमी पावसाची नोंद आपत्ती व्यवस्थापनाने केली. मात्र, मध्यरात्रीनंतर पावसाने अधिकच जोर धरला, सकाळी पहाटे पाचवाजेपर्यंत ठाण्यात १६१.६६ मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीनंतर तब्बल ५७ मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसाचा तडाखा ठाणेकरांना बसला. ठाण्याच्या राबोडी परिसरात ३० फुटांची कोकणी कब्रस्तान, किंजल बिल्डिंग समोर, पंचगंगा रोड, राबोडी नं २, येथे कंपाउंड वॉल कोसळली. ही भिंत बाजूलाच पार्क केलेल्या गाड्यांवर पडल्याने ५ बाईक आणि एका रिक्षावर पडल्याने या वाहनांचे नुकसान झाले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकाने मदत कार्य केले. तर घोलाईनगर येथेही नाल्याची भिंत पडून तीन घरांचे नुकसान झाले. या घटनेत जीवितहानी झाली नाही. दरम्यान, मागील २४ तासांत ठाण्यात १८६.२ मिमी पाऊस पडला असून अनेक पडझाडीच्या घटना घडल्या.मध्य रेल्वेची वाहतूक विलंबानेडोंबिवली : पहाटेपासून कोळसणाऱ्या पावसामुळे मंगळवारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण ते एक तास उशिराने धावत होती. पावसामुळे सोमवारी घरी बसणेच पसंत केलेल्या चाकरमान्यांनी पाऊस धारा झेलत रेल्वेस्थानक गाठले. त्यामुळे कल्याण ते कसारा, कल्याण-कर्जत तसेच ठाण्यापर्यंतच्या स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. गाड्या विलंबाने का होईना धावत असल्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला.कल्याण-डोंबिवलीमध्ये दुपारपर्यंत दमदार सरी कोसळल्या. दुपारी १२ नंतर जोर काहीसा कमी झाला. मात्र, लोकल विलंबाने धाव असल्याने प्रवासी, सकाळी घराबाहेर पडलेले शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे हाल झाले. ठिकठिकाणी पावसाची संततधार कायम असल्याने मुंबई परिसरातून लोकल डाउनमार्गे येण्यास विलंब झाला होता. त्याचा परिणाम वेळापत्रकावर झाला.डोंबिवली स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावरील पत्र्याच्या शेडमधून गळणाºया पाण्याचा त्रास पादचाºयांना सहन करावा लागला. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक एकला जोडणाºया मुंबई दिशेकडील पादचारी पुलाच्या पायºयांची डागडुजीची आवश्यकता आहे. या पुलावरून जाताना प्रवाशांना त्रास होत आहे. ठाकुर्ली स्थानकातही जुन्या पादचारी पुलावर तिकीट घराजवळ पावसाचे पाणी साचत आहेत. त्यामुळे प्रवाशांना घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे.जुन्या पत्रीपुलावरून अवजड वाहनांना बंदीकल्याण : शहरातील ब्रिटिशकालीन जुन्या पत्रीपुलीवर सध्याच्या मुसळधार पावसात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पुलावरून जड-अवजड वाहनांना वाहतूकीस पूर्ण वेळ मज्जाव करण्यात आला आहे. ही वाहने रात्री ११ ते पहाटे ५ दरम्यान नवीन पत्रीपुलावरून वळवण्यात येत असल्याची अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे.कल्याणमध्ये रेल्वे मार्गावर पत्रीपूल उभारण्यात आला आहे. जुन्या पुलावर खड्डे पडले आहेत. अलिकडेच एका खड्ड्यात एका मोठ्या वाहनाचे चाक अडकल्याने अर्धा तास कोंडी झाली होती. ट्राफिक वार्डनने हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मागील दोन दिवसातील पावसामुळे तो आणखी मोठा झाला आहे. त्यामुळे या पुलाच्या डागडुजीची मागणी होत आहे. दरम्यान, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, सुचकनाका येथून जुन्या पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपास-दुर्गाडीच्या दिशेने वाहने जातात. मात्र, आता ती नवीन पुलावरून वळवण्यात येतील, असे वाहतूक विभागाने मंगळवारी काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे. जुन्या पत्रीपुलाचे नवीन बांधकाम अथवा दुरुस्ती होईपर्यंत, हा वाहतुकीतील बदल राहणार आहे.तब्बल ८६ तक्रारीआपत्ती व्यवस्थापनाकडे ८६ तक्रारी आल्या. यात सहा आगीच्या तुरळक घटना, १० झाड पडल्याच्या, ३८ ठिकाणी पाणी जमल्याच्या भिंत कोसळल्याच्या ४ , नाल्याच्या दोन भिंती पडल्याच्या घटना होत्या.मंगळवारी दुपारी घोडबंदर भागात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने काजुपाडा येथे वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला होता. त्यामुळे या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस