शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे  जिल्ह्यात पर्यटनबंदी! जिल्हाधिकाऱ्यांच्या फर्मानाने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 04:26 IST

ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

ठाणे  - एकीकडे सरकार राज्यातील नागरिकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्यासाठी आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा विचार करीत असताना पावसाळ्यात जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यावर उपाययोजना शोधण्याऐवजी कामचुकार प्रशासनाने अशा रीतीने थेट पर्यटनावरच निर्बंध आणल्याने पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे.जिल्हाधिकाºयांच्या या तुघलकी फर्मानामुळे ठिकठिकाणच्या स्थानिक व्यावसायिकांच्या पावसाळ्यातील रोजगारावरच गदा आली आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात, म्हणून त्या त्याठिकाणचे स्थानिक बेरोजगार तात्पुरते ढाबे, टेंट टाकून काकडी, चिंचा, बिस्किटे, चहा, कॉफीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात, रानभाज्या विकतात. यातून त्यांना तात्पुरता रोजगार मिळतो. शिवाय, लांबवरून आलेल्या पर्यटकांची सोयही होते. काही ठिकाणी पर्यटक मुक्कामाला येत असल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकांच्याही व्यवसायावर यामुळे गदा येणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांनी जिल्हाधिकाºयांच्या या फर्मानाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून ते मागे घेण्याची मागणी केली आहे.मनाईस्थळं१ ठाणे तालुक्यातील येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपासवरील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरकिनारा२ कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, सुभेदारवाडा, गणेशघाट चौपाटी३ मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली गोरखगड, सिंगापूर नाणेघाट, धसई धरण, आंबेटेंबे४भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर.५ शहापूर तालुक्यातील भातसा धरणस्थळ, कुंडन, दहिगाव, माहुली किल्ला, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत, सापगाव नदी, कळंबे नदीकिनारा.काहींकडून स्वागत या सर्व ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांना धबधब्यावर जाणे, खोल पाण्यात उतरणे, दरीचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे, मद्य बाळगणे, मद्यधुंद होऊन प्रवेश करणे, महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, धबधब्याच्या परिसरात दुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहने घेऊन जाणे, ध्वनी, वायू, जलप्रदूषण करणे, अशा बाबीस प्रतिबंध केला, तो स्वागतार्ह असल्याचे काही ठाणेकरांचे मत आहे.पर्यटकांत संताप : अशा प्रकारे पर्यटनस्थळच नव्हे, तर त्यापासून एक किमीपर्यंतच्या परिघात जाण्यास मनाई करण्याऐवजी प्रशासनाने सुरक्षा यंत्रणेसह आपले कर्मचारी धांगडधिंगा करणाºया पर्यटकांवर कारवाई करणे अपेक्षित असताना सरसकट सर्वांना तेथे जाण्यास मनाई केल्याने संताप व्यक्त होत आहे....तर कल्याण-नगर मार्गच बंद होईलपर्यटनस्थळांच्या एक किमी परिघात पर्यटनबंदी म्हणजे नागरिकांनी जिल्ह्यातून कुठेच प्रवास करायचा नाही का? कारण बहुतेक पर्यटन स्थळे महामार्ग, राज्यमार्गांच्या एक किमी परिघात आहेत. माळशेज घाटातील बंदीमुळे तर कल्याण-नगर मार्गच बंद होईल.

टॅग्स :tourismपर्यटनnewsबातम्या