शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे  जिल्ह्यात पर्यटनबंदी! जिल्हाधिकाऱ्यांच्या फर्मानाने नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 04:26 IST

ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

ठाणे  - एकीकडे सरकार राज्यातील नागरिकांचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्यासाठी आनंद मंत्रालय स्थापन करण्याचा विचार करीत असताना पावसाळ्यात जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळी विशेषत: धबधबे, तलाव, धरणे याठिकाणी गर्दी होऊन अपघातात पर्यटकांचे जीव जातात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा ठिकाणी एक किलोमीटर परिसरात ३१ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यावर उपाययोजना शोधण्याऐवजी कामचुकार प्रशासनाने अशा रीतीने थेट पर्यटनावरच निर्बंध आणल्याने पर्यटकांत नाराजी व्यक्त होत आहे.जिल्हाधिकाºयांच्या या तुघलकी फर्मानामुळे ठिकठिकाणच्या स्थानिक व्यावसायिकांच्या पावसाळ्यातील रोजगारावरच गदा आली आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेरून पर्यटक येतात, म्हणून त्या त्याठिकाणचे स्थानिक बेरोजगार तात्पुरते ढाबे, टेंट टाकून काकडी, चिंचा, बिस्किटे, चहा, कॉफीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लावतात, रानभाज्या विकतात. यातून त्यांना तात्पुरता रोजगार मिळतो. शिवाय, लांबवरून आलेल्या पर्यटकांची सोयही होते. काही ठिकाणी पर्यटक मुक्कामाला येत असल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकांच्याही व्यवसायावर यामुळे गदा येणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांनी जिल्हाधिकाºयांच्या या फर्मानाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून ते मागे घेण्याची मागणी केली आहे.मनाईस्थळं१ ठाणे तालुक्यातील येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, मुंब्रा बायपासवरील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरकिनारा२ कल्याण तालुक्यातील कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, सुभेदारवाडा, गणेशघाट चौपाटी३ मुरबाड तालुक्यातील सिद्धगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली गोरखगड, सिंगापूर नाणेघाट, धसई धरण, आंबेटेंबे४भिवंडी तालुक्यातील नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर.५ शहापूर तालुक्यातील भातसा धरणस्थळ, कुंडन, दहिगाव, माहुली किल्ला, चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत, सापगाव नदी, कळंबे नदीकिनारा.काहींकडून स्वागत या सर्व ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांना धबधब्यावर जाणे, खोल पाण्यात उतरणे, दरीचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे, मद्य बाळगणे, मद्यधुंद होऊन प्रवेश करणे, महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी, मोठ्या आवाजात संगीत वाजवणे, धबधब्याच्या परिसरात दुचाकी, चारचाकी, सहाचाकी वाहने घेऊन जाणे, ध्वनी, वायू, जलप्रदूषण करणे, अशा बाबीस प्रतिबंध केला, तो स्वागतार्ह असल्याचे काही ठाणेकरांचे मत आहे.पर्यटकांत संताप : अशा प्रकारे पर्यटनस्थळच नव्हे, तर त्यापासून एक किमीपर्यंतच्या परिघात जाण्यास मनाई करण्याऐवजी प्रशासनाने सुरक्षा यंत्रणेसह आपले कर्मचारी धांगडधिंगा करणाºया पर्यटकांवर कारवाई करणे अपेक्षित असताना सरसकट सर्वांना तेथे जाण्यास मनाई केल्याने संताप व्यक्त होत आहे....तर कल्याण-नगर मार्गच बंद होईलपर्यटनस्थळांच्या एक किमी परिघात पर्यटनबंदी म्हणजे नागरिकांनी जिल्ह्यातून कुठेच प्रवास करायचा नाही का? कारण बहुतेक पर्यटन स्थळे महामार्ग, राज्यमार्गांच्या एक किमी परिघात आहेत. माळशेज घाटातील बंदीमुळे तर कल्याण-नगर मार्गच बंद होईल.

टॅग्स :tourismपर्यटनnewsबातम्या