शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नोकरीधंद्यासाठी हीच ती वेळ; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी सरसावले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 01:19 IST

मनसे देणार कौशल्यविकासाचे धडे

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : शहरात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय लॉकडाउनमुळे मूळ गावी परतल्यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. छोटे व्यवसाय, कौशल्यपूर्ण कामांमध्ये भूमिपुत्रांनी यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परप्रांतीय गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भूमिपुत्रांनी भरून काढून या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा सर्वच थरांतून केली जात आहे. मनसेने त्यासाठी मराठी तरुणांमध्ये कौशल्यविकासाबाबत योजनाही आखली आहे.

ठाणे जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांची संख्या अधिक आहे. लॉकडाउनमुळे उपासमार, पगार नसल्याने घराचे भाडे भरण्यास पैसे नसल्याने ते मूळ गावी परतत आहेत. परप्रांतीयांच्या जाण्यामुळे हार-फुलांचा व्यवसाय, खाद्यपदार्थांच्या गाड्या, लॉण्ड्री, इलेक्ट्रॉनिक कामे, भाजी, मासळी, फळव्यवसाय, वेल्डर, सुरक्षारक्षक, सुतारकाम, बांधकाम, रिक्षा-टॅक्सी व्यवसाय अशा अनेक छोट्या-मोठ्या रोजगारांची संधी मिळणार आहे. मनसेने यासाठी पुढाकार घेऊन मराठी तरुणांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील अमराठी व्यापारीही भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याबाबत आग्रही आहेत. भूमिपुत्रांनी पुढे येऊन ही कामे करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मराठी माणसाने व्यवसाय करावा, यासाठी अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांनी ‘चला उद्योजक होऊ या’ ही मोहीम हाती घेतली आहे. भरपूर कामे असून कोणीही बेरोजगार राहणार नाही, असे नाकती यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे निराश न होता मराठी तरुणांनी छोटे-मोठे व्यवसाय करून त्यावर मात करावी. या परिस्थितीचा जे फायदा घेतील, तेच टिकतील, असेही नाकती म्हणाले.

मराठी तरुणांमध्ये कला-कौशल्याचा विकास करण्यावर भर दिला जाणार असून त्यासाठी योजनाही आखली आहे. ठाणे महापालिकेने फेरीवाला समितीचे सर्वेक्षण करून भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जाणार असल्याचे मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी माणसालाच प्राधान्य मिळावे, असे आमचे मत आहे. आता चांगली संधी चालून आली आहे. मातृभाषेतून ग्राहकाला एखादी वस्तू पटवून देणे सोपे जाते, असे नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले. लॉकडाउननंतर कामगारांची गरज लागणार असून भूमिपुत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा, असेही शहा म्हणाले.

मराठी व्यावसायिकांना मदत करणार!

कोणत्याही कामाची लाज न बाळगता मराठी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच, लॉकडाउनमुळे ज्या मराठी मुलांचे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत, अशांना उभारी घेण्यासाठी मदत करणार असल्याचेही पाचंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMNSमनसेMaharashtraमहाराष्ट्र