शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी वाहतुक मार्गाला लागली गळती; आॅक्टोबर २०१७ मध्ये झाले होते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 21:49 IST

२००९ पासुन भार्इंदर पुर्व/पश्चिम दरम्यान महत्वाकांक्षी ठरलेल्या भुयारी वाहतुक मार्गाचे अखेर २१ आॅक्टोबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र अवघ्या तीन महिन्यांत या मार्गाला गळती लागल्याने तो नियोजनशुन्य ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.  

- राजू काळे  

भार्इंदर - २००९ पासुन भार्इंदर पुर्व/पश्चिम दरम्यान महत्वाकांक्षी ठरलेल्या भुयारी वाहतुक मार्गाचे अखेर २१ आॅक्टोबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र अवघ्या तीन महिन्यांत या मार्गाला गळती लागल्याने तो नियोजनशुन्य ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.   शहरातील वाहतुक कोंडीच्या नियोजनासाठी २० नोव्हेंबर २००९ रोजीच्या महासभेने शहराच्या उत्तरबाजुस पुर्व/पश्चिम भुयारी वाहतुक मार्गाला मंजुरी दिली.  सुरुवातीला हा मार्ग बॉक्स पुशिंग पद्धतीने बांधण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी सुमारे ९ कोटी ५० लाखांची तरतुद करण्यात आली. या कामाच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने सल्लागाराच्या सुचनेनुसार आयआयटी, मुंबई (भारतीय प्राद्योगिक संस्था) मार्फत प्रकल्पाच्या जागेची तपासणी केली. त्यात प्रकल्पाच्या जागेत दलदल असल्याने बॉक्स पुशींगची पद्धत अयोग्य ठरविण्यात आली. त्यातच दोन्ही बाजुंना नाले व सुमारे २००  मीटर अंतरावर खाडी असल्याने मायक्रो टनेल ट्रेन्चलेस पद्धतीचा वापर करण्याची सुचना करण्यात आली. पालिकेने त्यासाठी सुमारे ४३ कोटी ७६ लाखांच्या खर्चाची तरतुद त्यावेळच्या अंदाजपत्रकात केली. सुमारे ७० मीटर लांब व १० मीटर रुंदीचा भुयारी वाहतुक मार्गाच्या बांधकामासाठी ८ वेळा निविदा काढण्यात आल्या. अखेर त्याच्या बांधकामाचे कंत्राट मे. घई कन्सस्ट्रक्शन लि. या कंपनीला २५ मे २०११ रोजी देण्यात आले. सुरुवातीला मार्ग पुर्ण करण्याची मुदत मे २०१४ पर्यंत होती. अनेकादा त्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्याची मुदत सतत वाढविण्यात आली. त्यात प्रामुख्याने २०१४ मध्ये रेल्वेने १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढवुन पश्चिम दिशेस नवीन यार्ड बांधले. त्यामुळे भुयारी मार्ग सुमारे ६ मीटर खाली नेण्याची सुचना रेल्वे प्रशासनाकडुन पालिकेला करण्यात आली. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने पालिकेने २०१४-१५ च्या अंदाजपत्रकात १७ कोटी ४५ लाखांची तरतुद केली. यानंतर रेल्वेने तब्बल १ वर्षानंतर प्रकल्पाच्या बांधकामाला ग्रीन सिग्नल दिला. तद्नंतर या मार्गासाठी रेल्वेच्या जागेचा वापर केल्याचा साक्षात्कार रेल्वे प्रशासनाला झाल्याने पालिकेकडे ७ कोटींच्या लेव्हिएबल चार्जेसची मागणी करण्यात आली. तो न भरल्याने ेरेल्वेने प्रकल्पाचे काम मे २०१४ पासुन बंद पाडले. पालिकेने जानेवारी २०१५ मध्ये रेल्वेकडे रक्कम भरल्यानंतर तब्बल ८ महिन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी देखील वाढलेल्या खर्चासाठी पालिकेने २०१५-१६ मध्ये १६ कोटी २५ लाख तर २०१६-१७ मध्ये १८ कोटी व २०१७-१८ मधील अंदाजपत्रकात १२ कोटींची तरतुद करण्यात आली.पालिकेच्या स्व-खर्चातून बांधण्यात आलेल्या या भुयारी मार्गासाठी सुमारे १२० कोटींहुन अधिक निधी खर्ची घातल्याने तो एकमेव महागडा प्रकल्प ठरला. सतत तांत्रिक अडचणीत सापडलेला मार्ग अखेर तत्कालिन पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या प्रयत्नाने त्याचे काम युद्धपातळीवर करुन तो २१ आॅक्टोबरन २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच या मार्गाला गळती लागल्याने पालिकेने त्यासाठी केलेला कोट्यावधींचा खर्च पाण्यात गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. पावसाळ्यात तर त्याला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने पालिकेने वेळीच त्यातील गळती रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरीकांकडुन व्यक्त केल्या जात आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक