शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

हजारो नागरिक आजही विना‘आधार’

By admin | Updated: January 28, 2017 02:39 IST

केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत आधारकार्ड सक्तीचे करून प्रत्येक तालुक्यात केंद्र उभारून आधारकार्ड देण्याचा सपाटाच लावला. मात्र,

भातसानगर : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत आधारकार्ड सक्तीचे करून प्रत्येक तालुक्यात केंद्र उभारून आधारकार्ड देण्याचा सपाटाच लावला. मात्र, तरीही शहापूर तालुक्यात हजारो नागरिक आजही आधारकार्डविनाच आहेत.सर्व शासकीय सुविधा या आधारकार्ड नसेल तर मिळणार नसल्याने अनेकांनी ती काढून घेतली. मात्र, यासाठी मुळात त्या कार्यालयापर्यंत जाणेच खर्चिक होते. त्याच वेळी गावागावांत, खेड्यापाड्यांतील शाळांत जाऊनही आधारकार्ड काढून देणे आवश्यक असताना ती न दिल्याने आज तालुक्यातील हजारो नागरिक आधारकार्ड काढून घेण्यापासून वंचित आहेत. तर, खाजगीतून आधारकार्ड काढण्यासाठी त्यांना २०० ते ३०० रु पये मोजावे लागतात.शहापुरात मोफत आधार काढण्याचे काम तालुक्यात सुरू होते. तेव्हा शासकीय कर्मचारी, स्थानिक नागरिक यांची गर्दी या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होती. ही केंद्रे कधी वासिंद, डोळखांब, कसारा तर कधी अन्य ठिकाणी फिरती असल्याने नागरिकांची ओढाताण होत होती. नंतर काढू, अशा विचारात असताना ही केंद्रे कधी गायब झाली, हेच नागरिकांना कळले नाही. त्यामुळे आता आधारकार्डासाठी त्यांची वणवण सुरू आहे. (वार्ताहर)