शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणार; ‘एनडीए’ ही भ्रष्टाचाराचे डबे जोडलेली गाडी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 12:46 IST

शिवसेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या हिंदी भाषिक कार्यकर्ता मेळाव्यात ठाकरे बोलत होते...

ठाणे : येणारी लोकसभेची २०२४ ची निवडणूक भाजपला कठीण दिसत असल्याने ‘आ जा मेरे गाडी में बैठ जा’ या पद्धतीने वेगवेगळ्या नेत्यांना भाजप आपल्यासोबत घेऊन एनडीएची जमवाजमव करीत आहे. परंतु महाराष्ट्रात अजित पवार यांना सोबत घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ मोदींवर आली आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ही भ्रष्टाचाराचे डबे जोडलेली गाडी झाली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे  केली.शिवसेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या हिंदी भाषिक कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, मी मोदी किंवा कोणा एका व्यक्तीच्या विरोधात नाही, मी सध्या सुरू असलेल्या गुलामगिरीच्या विरोधात आहे. भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करायचे आहे. देशावर यापूर्वी पोर्तुगीज, इंग्रजांनी राज्य केले. त्यांच्या गुलामीतून आपली मुक्तता झाली. ते गेले तसे यांनादेखील एक दिवस जावेच लागले, असे ठाकरे म्हणाले. मणिपूरमध्ये दोन महिलांवर अत्याचार केले, पण कोणी कृष्ण बनून त्यांना वाचवायला पुढे गेला नाही. महाभारतात द्रौपदीने अब्रू वाचविण्यासाठी कृष्णाचा धावा केला होता. यावेळी द्रौपदी वस्त्रहरणावरील एक कविता वाचून दाखवत ठाकरे यांनी पंतप्रधानांचे धृतराष्ट्र असे वर्णन केले. ते म्हणाले की, धृतराष्ट्राला डोळे नव्हते, आपल्या पंतप्रधानांना डोळे असूनही त्यांना महिलांवरील अत्याचार दिसत नाहीत. देशाच्या राष्ट्रपतीपदी महिला आहे, मणिपूरच्या राज्यपाल महिला आहेत, त्यांना हे दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला. मणिपूरमध्ये सीबीआय, ईडी आणि इन्कम टॅक्स पाठवून दंगेखोरांची चौकशी केली व अमित शाहांनी दंगलखोरांचा भाजपमध्ये समावेश केल्यास दंगल दुसऱ्या दिवशीच शांत होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे म्हणाले की, भाजप हा सर्वांत मोठा भ्रष्ट पक्ष आहे. चायनीज मालसुद्धा बाजारात येतो आणि देवाच्या मूर्तीसुद्धा चायनीज मिळतात,  तसेच काही बोगस लोक शिवसेनेला आपले म्हणताहेत पण मला त्यांना सांगायचं आहे की, आम्हीच खरी शिवसेना आहोत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील. 

एक व्यक्ती ही देशाची ओळख नव्हेठाकरे म्हणाले की, निवडणुका आल्या की भाजपला एनडीएची आठवण येते. जुने मित्र आठवतात. तुम्ही बलवान झालात मग तोडफोडीचे राजकारण का करताय. यावरून भाजपचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसून येते. देश म्हणजे भाजप नाही, भारतमाता सर्वांची आहे. भारताच्या स्वातंत्र्यात भाजपचे कोणतेही योगदान नव्हते. देशाची ओळख कोणत्याही व्यक्तीच्या नावाने होत नाही. निवडणुका आल्या की जात, भाषा, पंथ यांच्यात भांडण लावण्याचे काम ते करतात. देशाचा विकास हा धर्मावर नसून उद्योग आणि तंत्रज्ञानावर झाला पाहिजे.  माझ्यावर माझे कुटुंब आणि माझ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे उत्तर भारतीयांशी प्रेमसंबंध असल्याने मी नेहमीच कुटुंबप्रमुख म्हणून काम करेन.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाthaneठाणे