शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पोस्को कायद्यातंर्गत किती दिवसांत FIR नोंदवावा,यासाठी वेळेचे बंधन नाही - मनिषा तुळपुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 7:20 PM

एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो.

कल्याण - एखाद्या मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांचा गुन्हा किती दिवसात नोंदवावा यासाठी पोस्को कायद्याअंतर्गत कोणतेही वेळेच बंधन नाही. दडपणामुळे काही वेळा तक्रार उशिरा दिली जाते. गुन्ह्याच्या घडल्यानंतर काही दिवसांनी जबाब नोंदविला जातो. त्यासाठी डाक्टरांचे मत महत्त्वाचे आहे. गुन्हा नोंदविण्यास उशीर का झाले याचे योग्य ते कारण द्यावे लागते. याउलट तीन महिन्यांपर्यंत गुन्हा नोंद करावा लागतो, असे मत अॅड. मनिषा तुळपुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग, परिवर्तन महिला संस्था आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक अत्याचार प्रकरणी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, सामाजिक संस्था तसेच वकील यांची भूमिका व जबाबदारी’’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुळपुळे बोलत होत्या. समाजातील बालक-बालिका आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत  आहे.

त्याप्रमाणात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गुन्हेगारांना कठोर शासन होत नसल्याने प्रवृत्तीला आळा बसण्याऐवजी या प्रकारच्या गुन्ह्याची संख्या वाढत आहे. पोस्को कायदा व पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केली आहे. त्यावर या परिसंवादात माहिती देण्यात आली.  तुळपुळे म्हणाल्या,  आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याच बरोबर पीडितांचे पुनर्वसन होणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये समुपदेशन ,वैद्यकीय उपचार, स्वत:च्या पायावर उभे करणे आणि शिक्षण या गोष्टी पुनर्वसनात येतात. बाल लैंगिक शोषणाबाबत संवेदनशीलता, खूप वेळ आणि एका चांगल्या टीमची गरज असते. 16 ते 18 हे वय आकर्षणाचे असते. मुलं आणि मुली प्रेमात पडल्यावर आर्थिक परिस्थिती, जात, धर्म या गोष्टी मध्ये येतात.

अशावेळी मुली घरी जात नाही. त्यांना बालसुधारगृहात ठेवा आणि 18 वर्षाची झाल्यावर निर्णय घेऊ द्या. पोक्सो कायद्यातंर्गत काही प्रश्न पडल्यास त्यांवर चर्चा व शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम झाले पाहिजेत. शाळेत मुला-मुलींना जबाबदार लैंगिक वर्तन शिकविले जात नाही. मुलं यापासून वंचित राहतात. एखाद्या व्यक्तींनी चुकीची तक्रार केली व ते सिध्द झाले तर त्या व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. अशी ओरड महिला आणि मुलांच्या बाबतीत वारंवार होत असते. आरोपी सज्ञान नसल्यास त्याने गुन्हा क्रिमिनल माईण्डने केला आहे का हे पाहिले जाते. चांगले जीवन जगण्याची संधी दिली जाते. समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण त्यांना दिले जाते, असे ही त्यांनी सांगितले.