शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

...तर केडीएमसी, एमआयडीसीचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 5:23 AM

दररोज २६६ एमएलडी पाणीचोरी : लघुपाटबंधारे विभागाने दिली तंबी

सुरेश लोखंडे 

ठाणे : मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षाएमआयडीसी सुमारे २०० दशलक्ष लीटर (एमएलडी) व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलून चोरी करत असल्याचे पाहणीअंती उघड झाले. ही पाणीचोरी तत्काळ थांबवा, अन्यथा पाणीपुरवठाच बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश लघुपाटबंधारे विभागाने दिल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत.

धरणसाठ्यामध्ये यंदा सुमारे २२ टक्के पाण्याची तूट आहे. ही भरून काढण्यासाठी २२ आॅक्टोबरपासून महापालिका, नगरपालिकांसह एमजेपी, टेमघर आदी पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थांना २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या कपातीसाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे सर्वानुमते मान्यही झाले. त्यानुसार, आता सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पूर्ण बंद ठेवला जात आहे. परंतु, एमआयडीसी त्यांच्या ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी पाणी रोज उचलत असल्याचे पाहणीत उघड झाले. याप्रमाणेच केडीएमसीदेखील त्यांच्या २३४ एमएमलडी मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी उचलत असल्याची बाब निदर्शनास आली.या प्रकारे चोरून जादा पाणी उचलत राहिल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होईल. त्यांच्या या पाणीचोरीचा फटका जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बसून जादा पाणीकपात सोसावी लागेल. यामुळे ठाण्यासह उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या नागरिकांवर अन्याय होईल. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एमआयडीसी व केडीएमसीला त्यांची मनमानी पाणीचोरी तत्काळ थांबवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने जारी केले. अन्यथा उल्हास नदी, बारवी धरण आदी ठिकाणांहून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्याची तंबी खास बैठक घेऊन देण्यात आली आहे. यामुळे आता त्यांच्याकडून जादा पाण्याची चोरी होणार नसल्याची अपेक्षा पाटबंधारे प्रशासनाने व्यक्त केली आहे.दिवाळीचा जादा पाणीपुरवठा बंददिवाळी संपलेली असल्यामुळे आधी लागू केलेली २२ टक्के पाणीकपात आता पूर्ववत करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखाने, कंपन्यांसह उल्हासनगर मनपा आदी ठिकाणी होणारा पाणीपुरवठा एमआयडीसी शुक्रवारी बंद ठेवणार असून अन्य दिवशी ५८३ एमएलडी मंजूर कोटा उचलणे भाग पडणार आहे.याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीचा २३४ एमएलडी पाणीपुरवठा मंगळवारी बंद ठेवण्यात येईल. तर, स्टेमद्वारे उचलण्यात येणारा २८५ एमएलडी पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. यामुळे भिवंडी, मीरा-भार्इंदर व घोडबंदरसह ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.याशिवाय अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सोमवारी तो बंद ठेवला जाईल. अन्य दिवशी त्यांना ९० एमएलडी पाणी उचलावे लागणार आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMIDCएमआयडीसीWaterपाणी