शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

...तर ‘ऑनर किलिंग’ घडले नसते- असिलता सावरकर-राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:58 IST

‘सावरकर घराण्यातील स्त्रीयांचे योगदान’ परिसंवाद

कल्याण : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनेक पैलू होते. त्यांचा पिंड समाजसुधारकाचा होता. अस्पृश्यता निर्मूलनाचे त्यांचे कार्य रत्नागिरीपुरतेच मर्यादित राहिले. त्यांनी उभारलेल्या पतितपावन या मंदिरात अस्पृश्यांना गाभाऱ्यात जाऊ न दर्शन घेता येऊ लागले. जाती-जातींमध्ये सरमिसळ झाल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट होणार नाही, हे त्यांचे विचार देशभरात पोहचले असते, तर आॅनर किलिंगसारखे प्रकार घडले नसते, असे मत सावरकर यांच्या नात असिलता सावरकर-राजे यांनी रविवारी व्यक्त केले. स्वातंत्र्यापासून ७० वर्षांत सावरकर यांना नाकारण्यापासून स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्याविषयी शाळांमधून खरा इतिहास शिकवला गेल्यास अनेक गैरसमज दूर होतील, असेही त्या म्हणाल्या.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुंबईच्या वतीने येथील के. सी. गांधी शाळेत ३१वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन रविवारी झाले. या संमेलनात ‘सावरकर घराण्यातील स्त्रियांचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात असिलता यांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत सावरकर यांच्या स्नुषा सुंदरबाई सावरकरही सहभागी झाल्या होत्या. या परिसंवादात असिलता बोलत होत्या.असिलता म्हणाल्या की, ७० वर्षात एकाही पंतप्रधानाने सावरकरांच्या अंदमान निकोबार येथील सेल्युलर जेलला भेट दिली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जेलला भेट दिली. सावरकरांना ज्या कोठडी ठेवले होते, तेथे पंधरा मिनिटे ते बसले होते.सावरकरांच्या निधनानंतर माझा जन्म झाला. त्यामुळे त्यांना मी पाहिले नाही. शाळेत गेले, तेव्हा मला माहीतही नव्हते की, मी सावरकरांची नात आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मी सावरकरांची नात आहे, हे माहीत होते. शाळेत त्यांची कविता, धडा व प्रसंग शिकताना ऊ र भरून यायचा. आजोबांची कविता व समाजसुधारक हे दोन पैलू मला आवडले. त्यांचा हा सुधारकी बाणा आम्ही चालवत आहोत. मीही परजातीत विवाह केला आहे. आमच्याकडे घरकाम करणारे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते, असे त्या म्हणाल्या. माझी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यांना मराठी समजायला जड जाते. त्यामुळे ते इंग्रजी पुस्तके वाचून सावरकर समजून घेतात, असेही असिलता यांनी सांगितले.सुंदरबाई म्हणाल्या की, गांधी हत्येच्या वेळीच माझे लग्न झाले. त्यावेळी देशात वातावरण दूषित होते. त्यामुळे आम्हा महिलांना घराबाहेर जाण्याची परवानगी नसायची. गांधी हत्येनंतर सावरकरांना दिल्ली येथे एक वर्ष कैद झाली होती. तेव्हा त्यांनी माझ्या घरच्यांना त्रास होता कामा नये, असे सरकारला बजावले होते. चार महिने घरावर पोलिसांचा पहारा होता. निवडणुकीत आचार्य अत्रे सावरकरांना भेटायला आले होते, तेव्हा सावरकरांनी त्यांचा सत्कार केला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली. सावकर गेले तेव्हा काँग्रेसचा एकही नेता त्यांच्या घरी आला नाही. मात्र लता मंगेशकर, व्ही. शांताराम, अभिनेत्री संध्या, संगीतकार सुधीर फडके अशी दिग्गज मंडळी आली होती, असेही त्या म्हणाल्या. आपल्या निधनानंतर शाळा व कार्यालये बंद न ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली होती. सावरकरांच्या पत्नी माई गेल्या तेव्हा त्यांची भेट झाली नव्हती. माई सावरकर यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यांचे पार्थिव घरी आणू नका. कारण, नात विद्युल्लता ही लहान असल्याने तिला ते पाहावणार नाही हा उद्देश त्यामागे होता, असे सुंदरबाई यांनी सांगितले.सद्य:स्थितीत सावरकरांनी देशाच्या सुरक्षेला महत्त्व दिले असतेसावकरांचे भगूर येथील घर हे सावरकर स्मारकाला दत्तक म्हणून द्यावे. त्यांचा राष्ट्रीय स्मारकात समावेश व्हावा यासाठी सावरकर स्मारकाकडून पाठपुरावा सुरू होता.सरकारने यासंदर्भातील अध्यादेश नुकताच काढला असल्याची माहिती असिलता सावरकर-राजे यांनी येथे दिली. सावरकरांनी लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या हा त्यावेळी विचार मांडला होता.तो कालसापेक्ष होता. आज ते हयात असते तर त्यांनी विचाराच्या क्रांतीसह देशाच्या सुरक्षिततेला महत्त्व द्या, असे सांगितले असते.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर