शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

भराव टाकून वरसावे तलावाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:08 AM

जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिसात तक्रार; ग्रामस्थांत संताप; श्रमजीवीचीही कारवाईची मागणी

ठाणे : घोडबंदर रोडला लागून असलेल्या वरसावे गावातील सार्वजनिक तलावात अवैधरीत्या विकासकाकडून मातीचा भराव करून तो नष्ट करण्यात येत आहे. भूखंड हडप करण्याच्या उद्देशाने तो नष्ट केला जात असल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी सार्वजनिक तलाव चोरीस गेल्याची लेखी तक्रारदेखील काशिमीरा पोलिसांत दाखल केली. याबाबत श्रमजीवी संघटनेनेही जिल्हाधिकाºयांना साकडे घालून या तलावाकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.वरसावे गावकºयांसाठी हा सार्वजनिक तलाव वर्षानुवर्षांपासून उपयुक्त ठरत आहे. गावकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची जागा हडपण्यासाठी त्यात अवैधरीत्या मातीचा भराव घालून तो बुजवण्यात येत आहे. वरसावेकºयांचा हक्क असलेल्या या तलावाची नोंद सातबारा उताºयावरदेखील आहे. या सार्वजनिक तलावाचा हक्क वरसावे गावकºयांकडे असतानाही त्यात मातीचा भराव टाकून बुजवण्यात आला आहे, असे ज्येष्ठ नागरिक रवींद्र गायकर या गावकºयाने काशिमीरा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर श्रमजीवी संघटनेनेदेखील जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करून वरसावे गावकºयांचा सार्वजनिक तलाव नष्ट केल्याचे नमूद केले आहे. यासाठी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष अशोक सापटे, सरचिटणीस बाळाराम भोईर, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना लेखी तक्रार देऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.कठोर कारवाई कराहा जुना सार्वजनिक तलाव नष्ट करणाºया विकासकाचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. याशिवाय, अवैधरीत्या टाकलेला भराव पूर्णपणे काढून हा सार्वजनिक तलाव मोकळा करता यावा, त्याची लांबी-रुंदी-खोली वाढवण्यात यावी आदी मागण्यांसाठी श्रमजीवीने जिल्हाधिकाºयांना साकडे घालून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.तर, चोरीला गेलेल्या या तलावाचा शोध घेण्यासाठी पोलिसात लेखी तक्रार केली आहे. यानुसार, नैसर्गिक तलाव कायद्यानुसार बुजवणे गंभीर गुन्हा असतानाही जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा या तलावास नष्ट करणाºया विकासकावर काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून असल्याचे श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी लोकमतला सांगितले.तलावावर गावकºयांचा उदरनिर्वाह : वरसावे गावामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पारंपरिक पद्धतीने येथील आदिवासी समाज या तलावात परंपरेनुसार मासेमारी करून उदरनिर्वाह करतो. पिण्याच्या पाण्यासाठी त्यातील पाण्याचा वापर केला जातो. त्यावर शेतीचे उत्पादनदेखील घेतले जात आहे. त्याचा भूखंड हडप करण्यासाठी काही राजकारणी व बड्या नेत्यांच्या कृपाशीर्वादाखाली विकासकाकडून त्यात अवैध मातीचा भराव टाकल्याचा आरोप गावकºयांकडून केला जात आहे.