शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पीडित दाम्पत्याची कुवैतमधील कामाच्या जाचातून सुटका; भाईंदरच्या भरोसा सेलची मोठी कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 13:16 IST

Couple Captive in Kuwait Returns Home : मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भाईंदर येथील भरोसा सेलकडे ज्योती पांडे या महिलेने तक्रार अर्ज दिला होता.

मीरारोड - चांगल्या पगाराच्या हेतूने कुवैत येथे घरकामासाठी गेलेल्या दाम्पत्याचा छळ होऊन, उलट त्यांच्यावरच तेथे कामगार न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्या पीडित दाम्पत्यास भारतीय दूतावासाच्या मदतीने भाईंदरच्या भरोसा सेलने सुखरूप मायदेशी आणले आहे . 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भाईंदर येथील भरोसा सेलकडे ज्योती पांडे या महिलेने तक्रार अर्ज दिला होता. तिच्याकडे पूर्वी घरकाम करणारी विजयालक्ष्मी ( ४०) नावाची महिला पती हरेश ( ४२ ) रा. मीरारोड हे दाम्पत्य एका एजंट मार्फत कुवैत येथे ५ एप्रिल २०२२ रोजी घरकाम व मुलांचा सांभाळ करण्यासाठी गेले होते. २ लहान मुलांचा सांभाळ, घराची सर्व साफसफाई , जेवण आदी कामासाठी त्यांना प्रत्येकी ४० हजार पगार ठरवण्यात आला होता . 

परंतु प्रत्यक्षात ते दाम्पत्य जेव्हा  कुवैत येथील घरमालक मोसाब अब्दुल्ला यांचे घरी कामासाठी गेले तेव्हा त्यांच्या घरामध्ये ९ लहान मुलांना सांभाळणे , ५ ते ६ खोल्या व हॉलची साफसफाई करणे, जेवण बनवणे आदी काम करावे लागत होते . रोज सकाळी ६ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजे पर्यंत असे तब्बल २२ तास त्यांना राबवून घेतले जात होते . सततच्या कामाच्या त्रासा मुळे विजयालक्ष्मी यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती खराब होऊन त्यांना फिट आल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. 

विजयालक्ष्मी यांनी ज्योती यांना समाज माध्यमातून स्वतःचे रुग्णालयातील फोटो पाठवून कुवैतमधील मालक त्यांना घराबाहेर सोडत नसल्याचे व त्यांचा मोबाईल काढून घेवून त्यांना घरातच बंद करून ठेवत असल्याचे सांगितले. आपणास परत भारतात यायचे असल्याने मदतीची विनंती ज्योती यांच्याकडे केली. यानंतर, भरोसा सेल ने आफ्रिकेतून एका पीडित महिलेस सोडवून आणल्याची वृत्तपत्रातील बातमी वाचण्यात आली असल्याने ज्योती यांनी भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. 

भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांना माहिती दिली . उपायुक्त विजयकांत सागर व मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेंसह सचिन तांबवे, समृद्धी भगत, आफ्रिन जुनैदी यांनी दाम्पत्यास मदत करण्यासाठी पावले उचलली. 

यानंतर, कुवैतमधील भारतीय दूतावासशी संपर्क साधला असता, संबंधित दाम्पत्याने कामाचा करारनामा केल्याने त्याप्रमाणे कामाची वेळ पूर्ण करावीच लागेल, मात्र पिडीत स्वत:हून भारतीय दूतावासात आले तर त्यांना मदत करू शकू, असे सांगण्यात आले . परंतु घर मालक सदर दाम्पत्यास बाहेर जाऊ देत नसल्याने अखेर २० जून रोजी ते भाजीपाला खरेदीच्या बहाण्याने बाहेर पडले व भारतीय दूतावासात दाखल झाले. 

दूतावासाने त्यांना आश्रय दिला व दाम्पत्यास दोन दिवसांनी कुवैत येथील कामगार न्यायालयात हजर केले. मात्र, न्यायालयात त्यांच्या विरुद्धच गुन्हा दाखल करून मालक मोसाबा याने न्यायालयात येऊन दाम्पत्याचे पासपोर्ट सादर केले. त्यावेळी न्यायालयाने ४ जुलै पर्यंत दाम्पत्याने स्वखर्चाने परत भारतात जावे अन्यथा मालकाचा जबाब नोंदवून दावा चालवला जाईल, असे निर्देश दिले. त्यानंतर भरोसा सेलने पीडित दाम्पत्याचे तिकीट काढण्या पासून आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करून ५ जुलै रोजी दाम्पत्यास भारतात परत आणले . 

घरकामाच्या मोबदल्यात चांगले पैसे मिळतील या अपेक्षेने भारतातून अनेकजण परदेशात जातात. परंतु तेथील कायदे नियम व करारातील अटीशर्ती आदींची शहनिशा न केल्याने त्यांचा छळ होऊन तेथेच अडकून पडतात. त्यामुळे सर्व माहिती घेऊनच परदेशात कामासाठी जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे .  

टॅग्स :PoliceपोलिसthaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर