शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

अक्षयचे पालक संपर्कातच नाहीत; दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 06:34 IST

कोर्टात दाद मागण्यासाठी ज्या वकिलाची नेमणूक केली होती त्या वकिलाच्यादेखील ते संपर्कात नसण्याची बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर अक्षय शिंदे याचे पालक संपर्कात आलेले नाहीत. एवढेच नव्हेतर, कोर्टात दाद मागण्यासाठी ज्या वकिलाची नेमणूक केली होती त्या वकिलाच्यादेखील ते संपर्कात नसण्याची बाब समोर आली आहे.

न्यायालयाने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर अक्षय याचे पालकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बदलापुरातील त्यांच्या निवासस्थानीही घराला कुलूप होते तर दुसरीकडे अक्षयच्या मावशीकडे अंबरनाथमध्ये वास्तव्यास असलेले अक्षयचे पालक त्या ठिकाणावरून निघून गेल्याची माहिती समोर येत आहे. पालक कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी त्याच्या पालकांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यासाठी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूकदेखील करण्यात आली होती. मात्र, ज्या दिवशी न्यायालयात शिंदे यांच्या पालकांनी केस लढण्याची इच्छा नसल्याचे विधान केले त्या दिवसापासून शिंदे हे वकिलांच्याही संपर्कात नाहीत. 

यासंदर्भात कटरनवरे यांना विचारले असता अक्षयच्या पालकांनी केस लढण्यास नकार दिल्यापासून ते माझ्याही संपर्कात नाहीत. ते कुठे आहेत आणि कोणत्या परिस्थितीत आहेत याची आपल्याला कल्पना नाही. दीड महिन्यापासून ते अंबरनाथमध्येही आलेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय