शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पालापाचोळा व फांद्यांच्या प्रक्रियेतून सुद्धा पालिकेला मिळणार उत्पन्न

By धीरज परब | Updated: April 13, 2024 19:16 IST

मीरा भाईंदर महापालिकेची शहरात उद्याने , मैदाने आहेत , या शिवाय विविध इमारती व कार्यालये असून त्या ठिकाणी लहान मोठी झाडे मोठ्या संख्येने आहेत .

मीरारोड - शहरातील झाडांचा पडणारा पाला पाचोळा , झाडांच्या लहान फांद्या आदी पासून मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून जळाऊ विटा तयार केल्या जात असून लवकरच त्याची क्षमता वाढवण्यात येऊन त्याच्या पासून पालिकेला आता नियमित उत्पन्न सुद्धा मिळणार आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेची शहरात उद्याने , मैदाने आहेत , या शिवाय विविध इमारती व कार्यालये असून त्या ठिकाणी लहान मोठी झाडे मोठ्या संख्येने आहेत . या शिवाय शहरातील सार्वजनिक रस्त्यावर झाडे आहेत . ह्या झाडांच्या छाटणी दरम्यान लहान मोठ्या फांद्या व पाला निघतो . सार्वजनिक ठिकाणी वा खाजगी ठिकाणी असलेली झाडे पावसाळ्यात पडण्याच्या घटना घडतात . तसेच  विकासकामात बाधा ठरतात म्हणून , घोकादायक म्हणून देखील मोठ्या प्रमाणात झाडे  तोडली जातात त्यावेळी त्यातून मोठ्या प्रमाणात झाडांचा पाला पाचोळा , फांद्या निघतात . नारळाच्या झावळ्या पडत असतात. 

ह्या आधी सदर झाडांचा पालापाचोळा , लहान फांद्या ह्या एखाद्या मोकळ्या भूखंडावर बेकायदा टाकला जात होता . तो सुकला कि त्याला आगी लावल्या जात होत्या . अश्या काही प्रकरणात पालिकेच्या अधिकारी - कर्मचारी यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे . तर झाडांचा हा पाला - फांद्या उत्तन  येथील डम्पिंगच्या ठिकाणी सुद्धा टाकला जातो . ह्या झाडांच्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने अखेर गांभीर्याने घेत त्यावर प्रक्रिया करण्या बाबत विचार सुरु केला . 

ह्या झाडांच्या पाला पाचोळा व लहान फांद्यां पासून खत तसेच जळाऊ विटा बनवण्यासाठी महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी सुमारे सव्वा वर्षां पूर्वी घोडबंदर येथील पालिका बस डेपो मागील जागेत प्रकल्प सुरु केला होता . सिरो एनर्जी ह्या कंपनीने सुमारे ५ टन क्षमतेचा प्रकल्प उभारला होता व त्यालाच प्रायोगिक तत्वावर  ६ महिने साठी चालवण्यास दिला होता . 

परंतु ६ महिन्यांची मुदत संपल्या नंतर मात्र नवीन ठेकेदार नेमण्या अभावी हा प्रकल्प बंद पडला होता . आयुक्त संजय काटकर यांनी झाडांच्या पाला पाचोळा व फांद्या वरील प्रक्रिया करणाऱ्या ह्या प्रकल्पाचा आढावा घेऊन निविदा प्रक्रिया करत महिन्याभरा पूर्वी सदर प्रकल्प नाशिकच्या अक्षता बायो मास्क फ्युएल ब्रिकेट या कंपनीस चालवण्यास दिला आहे . 

या ठिकाणी पालिकेने दिलेल्या मोकळ्या जागेत झाडांचा ओला सुका कचरा आणून गोळा केला जात आहे .   पूर्वी प्रमाणे मोकळ्या भूखंडात झाडांचा कचरा गोळा करण्याचे काम जवळपास बंद झाले आहे . रोज सुमारे १० ते १२ टन इतका झाडांचा कचरा निघत असतो . सदर कंपनीनेने तीन पाळ्या मध्ये प्रकल्प चालवून रोज सुमारे १० टन पाला पाचोळा व लहान फांद्यांवर प्रक्रिया करून त्या पासून जळाऊ विटा तयार करत आहे . सुक्या फांद्या , पाला हे क्रश केले जाते व नंतर साच्यात त्याच्या विटा तयार केल्या जातात.  तर हिरव्या पानां पासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे .  जळाऊ विटा तयार करून त्या विविध कंपन्या आदींच्या बॉयलर साठी पुरवल्या जात आहेत . तर पानांचे कंपोस्ट खत तयार केले जात आहे . 

अनिकेत मनोरकर ( अतिरिक्त आयुक्त , मीरा भाईंदर महापालिका ) - झाडांच्या पाने व लहान फांद्यांवर प्रक्रिया करून जळाऊ विटा आणि कंपोस्ट खत तयार केले जात असून ठेकेदार कंपनी हि स्वतः प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी नवीन यंत्रणा बसवणार आहे . जळाऊ विटाच्या प्रति टन मागे १ हजार ८०० रुपये तर कंपोस्ट खत च्या प्रति टन मागे १ हजार ८ रुपये रॉयल्टी पालिकेला मिळणार आहे . त्यामुळे शहरातील झाडांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सुटून पालिकेला त्या पासून नियमित उत्पन्न मिळणार आहे .