शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मनसे नेता जमील शेख खुनातील सूत्रधाराची हुलकावणी; घटनेला चार वर्षे उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:50 IST

ठाण्याच्या राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास जमील यांचा  दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता.

-जितेंद्र कालेकरठाणे : राबोडीतील मनसेचे शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांची चार वर्षांपूर्वी गोळीबार करून दोघांनी हत्या केली. यातील हल्लेखोरांसह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटकही केली. मात्र, यातील मुख्य सूत्रधारासह दोघांचा शोध सुरूच आहे. त्यामुळेच हे संपूर्ण प्रकरणच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी देण्याची मागणी जमीलच्या नातेवाइकांनी केली आहे. 

ठाण्याच्या राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास जमील यांचा  दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता. या घटनेचे ठाण्यात तीव्र पडसाद उमटले होते. या गुन्ह्यातील दुचाकीस्वार शाहिद शेख (२२) याला राबोडीतून तर गोळी झाडणाऱ्या इरफान शेख याला उत्तर प्रदेशातून गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने अटक केली होती. 

फरार ओसामाचा शोध सुरू असतानाच युनिट एकच्या ठाणे पथकाच्या हाती हबीब शेख याचाही या खुनातील सहभाग असल्याचे काही पुरावे लागले. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली. 

त्यापाठोपाठ ओसामा यालाही उत्तर प्रदेशच्या एसटीएफचे अधीक्षक बृजेश सिंह यांच्या मदतीने  १२ फेब्रुवारी २०२४  अटक केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर  खीरिया गावातील रहिवासी असलेल्या ओसामा याने त्याच्या गावातील इरफान ऊर्फ सोनू याच्या मदतीने जमीलची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. मात्र आजही या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मोकाट आहे.

मुख्य सूत्रधाराला कोणाचे संरक्षण? 

या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर जमीलच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त केला होता. पोलिसांच्या तपासात मात्र नजीब यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. या हत्येचा नेमका उद्देशही स्पष्ट झाला नाही. त्यामुळेच या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी जमीलचे मेव्हणे फजल सलेमानी शेख यांनी केली आहे.

खुनाच्या बदल्यात मिळणार होती चार घरे

जमीलच्या खुनाच्या बदल्यात ओसामाला चार घरे मिळणार होती. ती कोणाकडून मिळणार होती? यातील सूत्रधार कोण आहे? याचा उलगडा अजूनही झालेला नसल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. मात्र, ओसामाला आश्रय देणाऱ्यांसह अन्य एक अशा दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती  गुन्हे शाखेच्या युनिट १चे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली. 

‘त्या’ महिलेच्या हत्येचे गूढ कायम

ठाणे ग्रामीणमधील कसारा भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा चार महिन्यांपूर्वी खून झाला. तिचा मृतदेह नाशिक महामार्गालगत मिळाला होता. 

उत्तरीय तपासणीमध्ये तिचा कोणीतरी गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा कसारा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत आहे. 

यातील मारेकरी कोण? खून कोणत्या कारणांसाठी झाला? या सर्व बाबींचा छडा अजूनही लागलेला नसल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMNSमनसेPoliceपोलिस