शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मनसे नेता जमील शेख खुनातील सूत्रधाराची हुलकावणी; घटनेला चार वर्षे उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:50 IST

ठाण्याच्या राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास जमील यांचा  दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता.

-जितेंद्र कालेकरठाणे : राबोडीतील मनसेचे शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांची चार वर्षांपूर्वी गोळीबार करून दोघांनी हत्या केली. यातील हल्लेखोरांसह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटकही केली. मात्र, यातील मुख्य सूत्रधारासह दोघांचा शोध सुरूच आहे. त्यामुळेच हे संपूर्ण प्रकरणच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी देण्याची मागणी जमीलच्या नातेवाइकांनी केली आहे. 

ठाण्याच्या राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास जमील यांचा  दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता. या घटनेचे ठाण्यात तीव्र पडसाद उमटले होते. या गुन्ह्यातील दुचाकीस्वार शाहिद शेख (२२) याला राबोडीतून तर गोळी झाडणाऱ्या इरफान शेख याला उत्तर प्रदेशातून गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने अटक केली होती. 

फरार ओसामाचा शोध सुरू असतानाच युनिट एकच्या ठाणे पथकाच्या हाती हबीब शेख याचाही या खुनातील सहभाग असल्याचे काही पुरावे लागले. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली. 

त्यापाठोपाठ ओसामा यालाही उत्तर प्रदेशच्या एसटीएफचे अधीक्षक बृजेश सिंह यांच्या मदतीने  १२ फेब्रुवारी २०२४  अटक केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर  खीरिया गावातील रहिवासी असलेल्या ओसामा याने त्याच्या गावातील इरफान ऊर्फ सोनू याच्या मदतीने जमीलची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. मात्र आजही या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मोकाट आहे.

मुख्य सूत्रधाराला कोणाचे संरक्षण? 

या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर जमीलच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त केला होता. पोलिसांच्या तपासात मात्र नजीब यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. या हत्येचा नेमका उद्देशही स्पष्ट झाला नाही. त्यामुळेच या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी जमीलचे मेव्हणे फजल सलेमानी शेख यांनी केली आहे.

खुनाच्या बदल्यात मिळणार होती चार घरे

जमीलच्या खुनाच्या बदल्यात ओसामाला चार घरे मिळणार होती. ती कोणाकडून मिळणार होती? यातील सूत्रधार कोण आहे? याचा उलगडा अजूनही झालेला नसल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. मात्र, ओसामाला आश्रय देणाऱ्यांसह अन्य एक अशा दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती  गुन्हे शाखेच्या युनिट १चे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली. 

‘त्या’ महिलेच्या हत्येचे गूढ कायम

ठाणे ग्रामीणमधील कसारा भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा चार महिन्यांपूर्वी खून झाला. तिचा मृतदेह नाशिक महामार्गालगत मिळाला होता. 

उत्तरीय तपासणीमध्ये तिचा कोणीतरी गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा कसारा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत आहे. 

यातील मारेकरी कोण? खून कोणत्या कारणांसाठी झाला? या सर्व बाबींचा छडा अजूनही लागलेला नसल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMNSमनसेPoliceपोलिस