शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

मनसे नेता जमील शेख खुनातील सूत्रधाराची हुलकावणी; घटनेला चार वर्षे उलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 11:50 IST

ठाण्याच्या राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास जमील यांचा  दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता.

-जितेंद्र कालेकरठाणे : राबोडीतील मनसेचे शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (४९) यांची चार वर्षांपूर्वी गोळीबार करून दोघांनी हत्या केली. यातील हल्लेखोरांसह चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटकही केली. मात्र, यातील मुख्य सूत्रधारासह दोघांचा शोध सुरूच आहे. त्यामुळेच हे संपूर्ण प्रकरणच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी देण्याची मागणी जमीलच्या नातेवाइकांनी केली आहे. 

ठाण्याच्या राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून २४ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी दोनच्या सुमारास जमील यांचा  दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून खून केला होता. या घटनेचे ठाण्यात तीव्र पडसाद उमटले होते. या गुन्ह्यातील दुचाकीस्वार शाहिद शेख (२२) याला राबोडीतून तर गोळी झाडणाऱ्या इरफान शेख याला उत्तर प्रदेशातून गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे आणि पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने अटक केली होती. 

फरार ओसामाचा शोध सुरू असतानाच युनिट एकच्या ठाणे पथकाच्या हाती हबीब शेख याचाही या खुनातील सहभाग असल्याचे काही पुरावे लागले. त्याआधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाने त्याला २४ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली. 

त्यापाठोपाठ ओसामा यालाही उत्तर प्रदेशच्या एसटीएफचे अधीक्षक बृजेश सिंह यांच्या मदतीने  १२ फेब्रुवारी २०२४  अटक केली. उत्तर प्रदेशातील गोरखपूर  खीरिया गावातील रहिवासी असलेल्या ओसामा याने त्याच्या गावातील इरफान ऊर्फ सोनू याच्या मदतीने जमीलची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. मात्र आजही या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मोकाट आहे.

मुख्य सूत्रधाराला कोणाचे संरक्षण? 

या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्यावर जमीलच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त केला होता. पोलिसांच्या तपासात मात्र नजीब यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. या हत्येचा नेमका उद्देशही स्पष्ट झाला नाही. त्यामुळेच या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी जमीलचे मेव्हणे फजल सलेमानी शेख यांनी केली आहे.

खुनाच्या बदल्यात मिळणार होती चार घरे

जमीलच्या खुनाच्या बदल्यात ओसामाला चार घरे मिळणार होती. ती कोणाकडून मिळणार होती? यातील सूत्रधार कोण आहे? याचा उलगडा अजूनही झालेला नसल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. मात्र, ओसामाला आश्रय देणाऱ्यांसह अन्य एक अशा दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती  गुन्हे शाखेच्या युनिट १चे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली. 

‘त्या’ महिलेच्या हत्येचे गूढ कायम

ठाणे ग्रामीणमधील कसारा भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा चार महिन्यांपूर्वी खून झाला. तिचा मृतदेह नाशिक महामार्गालगत मिळाला होता. 

उत्तरीय तपासणीमध्ये तिचा कोणीतरी गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा कसारा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास करण्यात येत आहे. 

यातील मारेकरी कोण? खून कोणत्या कारणांसाठी झाला? या सर्व बाबींचा छडा अजूनही लागलेला नसल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMNSमनसेPoliceपोलिस