शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

सत्ताधाऱ्यांकडून देशातील नागरिकांना अच्छे दिनचे चित्र आजपर्यंत दिसले नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

By सुरेश लोखंडे | Updated: August 29, 2022 21:54 IST

...आतापर्यंतचा अनुभव बघता, जे काही सांगितले ते १०० टक्के केंद्रातील सरकारकडून झालेले नाही. थोडे फार कमी अधीक झाले. पण देशाला अच्छे दिन आल्याचे चित्र नागरिकांना आजपर्यंतही दिसले नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

ठाणे : केंद्रातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी २०१४च्या निवडणुकीत अच्छे दिनची घोषणा केली होती. पण अच्छे दिनचे चित्र देशातील नागरिकांना आजपर्यंतही जाणवत नाही. त्यानंतरच्या २०२२ ला या अच्छे दिनचे विस्मरण होऊन सत्ताधाऱ्यांनी ‘न्यू इंडिया २०२२’ चे आश्वासन दिले. आता पुढील २०२४च्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांनी देशाला 'फाईव ट्रिलीन इकोनॉमी’ करण्याचे  आश्वासन दिले. पण आतापर्यंतचा अनुभव बघता, जे काही सांगितले ते १०० टक्के केंद्रातील सरकारकडून झालेले नाही. थोडे फार कमी अधीक झाले. पण देशाला अच्छे दिन आल्याचे चित्र नागरिकांना आजपर्यंतही दिसले नाही, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीसाठी पवार ठाण्यात आले होते. पक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील सरकार कसे अपयशी ठरत आहे, यावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून, आपले नाव पुढे होण्याच्या शक्यतेसंदर्भात विचारली असता, पंतप्रधान पदासारखी कसलीही जाबबदार मी आता घेणार नाही. माझे वय आता ८२ वर्षाचे आहे. मोरारजी देसाई भाग्यवान होते. ते ८४ व्या वर्षी पंतप्रधान झाले. मोराजींचा कित्ता मी काही चालवू शकणार नाही. सामान्य माणसाच्या ज्या वेदना असतील जनतेच्या समस्यांची सोडणूक करण्याचे सूत्र माझ्याकडे असेल. असे पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास अनुसरून स्पष्ट करीत आपण पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत नसल्याचे स्पष्ट केले.

गुजरातमधील बिलकीस बानो प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की खालच्या कोर्टपासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतच्या निकालामध्ये या घटनेतील लोकांना अजन्म करावासाची शिक्षा सुनावली आहे. पण पंतप्रधान मोदी ज्या राज्यातून येतात तेथील त्यांच्या विचाराच्या सरकारने निर्णय घेऊन या घटनेतील सर्व आरोपींची सुटका केली. एवढेच नाही तर त्यांचा सन्मान, सत्कार केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. लालकिल्यावरील १५ आॅगस्टच्या भाषणात पंतप्रधानानंी देशातील स्त्रीयांच्या सन्मानाची भाषा केली आणि त्यांच्या राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून या लाजीरवाण्या घटनेतील आरोपींचा सत्कार केल्याची चित्र चिंताजणक असल्याचे त्यांनी सांगितले.

संसदेच्या लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे या केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या भाजपा पक्षाकडून होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्याचे पाहून महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, मध्ये प्रदेश, आंध्र, ओरीसा आदी राज्यातील नॉन बिजेपी सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना अमीश देऊन, सीबीआय, ईडी आदी यंत्रणांचा वापर करून सत्ता उलथवून टाकली जात आहे. हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे. 

गुजरात, आसाम या दोन राज्यातील सत्ता वगळता त्यांना लोकांनी सत्तेवर येऊ दिले नाही. लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्यामुळे भाजपाने देशातील नॉन बीजेपी सरकार हटवण्यासाठी यंत्रणांचा वापर केला आहे. याप्रमाणेच राज्यातील उध्दव ठाकरे सरकार पडले असून त्यांच्याशी सुसंगत संवाद नसलेल्या राजकीय नेत्यांनाही त्यांनी त्या कारणाखाली अडकूवन तुरूंगात टाकले. यासाठी त्यांनी अनिल देशमुख्या यांच्या घरांवर, नातेवाईकांवर टाकलेल्या धाडींसह नवाब मलीक, खासजदार संजय राऊत यांचे उदाहरणेही यावेळी दिले.

देशातील भाजपा सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून त्याविरोधात जनमत एकत्र करण्याच्या काळात गुलाम नबी यांनी कॉग्रेस पक्ष सोडला. पण हे चांगले झाले नाही. पार्लमेंटमधील ते माझे चांगले सहकारी आहे. ते भाजपाच्या भूमिकेविरोधात सतत आघाडीवर राहिलेले आहे. पण पक्ष सोडून जाण्यासाठी त्यांना काय संकट आले हे  माहित नसल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

याशिवाय राज्या कोणावर कधी धाड पडणार, कधी जेलमध्ये जाणार हे भाजपच्या काही लोकांना कसे कळते यावरून काही तरी गडबड असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहीत पवारांविषयी विचारलेल्या प्रश्नास अनुसरून त्यांनी भाजपात भविष्यवाणी वर्तवणार गट तयार झाल्याचे सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे