शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

ठाणेकरांना सोसावी लागणार पुढील आठवडाभर पाण्याची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 4:06 PM

पिसे बंधाऱ्याजवळ दुरुस्तीचे काम आणखी आठ दिवस सुरु राहणार असल्याने त्याचा फटका आता ठाणेकरांना सोसावा लागणार आहे. पुढील आठ दिवस ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देवॉल दुरुस्तीचे काम अद्यापही सुरुमहापालिका उचलते २०० दक्षलक्ष लीटर पाणी

ठाणे - शहरातील विविध भागात पाणी समस्येवरुन स्थायी समितीच्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला असातांना आता पुढील आठवडाभर ठाणेकरांना पाण्याची झळ सोसावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. भातसा नदीच्या पिसे बंधाऱ्याजवळ दुरु स्तीचे काम सुरु असल्यामुळे मागील आठ दिवसांपासून ठाणेकरांनापाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात या दुरु स्तीचा कामासाठी आणखी एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे ठाकले आहे.                          बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बाळकुम, वर्तकनगर, कोपरी आणि दिव्यातील पाणी समस्येला स्थानिक लोकप्रतिनिधींनी वाचा फोडली होती. परंतु आता पाणी समस्येचे ढग आता आणखी गडद होणार आहेत. ठाणे जिल्ह््यातील धरणांमधून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह््यातील सर्वच धरण काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रात मुबलक पाणी असतानाही बंधारा दुरु स्तीच्या कामामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहीले आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्याचे शहरात वितरण करते. या बंधाऱ्यातून मुंबई महापालिकेकडून दररोज दोन हजार दशलक्षलीटर तर ठाणे महापालिकेकडून २०० दशलक्षलीटर इतके पाणी घेते. ठाणे महापालिका विविध स्त्रोतांमार्फत पाणी घेऊन त्याचे शहरात वितरण करते. त्यापैकी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेसाठी या बंधाऱ्यातून पाणी उचलते. गेल्या आठ दिवसांपासून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्यामुळे ठाणे महापलिकेला नदी पात्रातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नाही. पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून दरवर्षी मुंबई महापालिकेकडून बंधाऱ्याच्या ‘बलुन वॉल’ची दुरु स्ती करण्यात येते. याच वॉलच्या दुरु स्तीचे काम मुंबई महापालिकेने सुरु केले असून या कामासाठी आणखी आठ दिवस लागणार आहेत. या दुरु स्तीच्या कामाचा फटका ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर होऊ लागला असून यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे उपनगर अभियंता रविंद्र खडताळे यांनी गुरूवारी पिसे बंधाऱ्याजवळील दुरु स्ती कामाची पाहाणी केली. या पाहाणी दरम्यान मुंबई महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता गोडबोले यांच्याकडून कामाचा आढावा घेऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी