शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

ठाणेकरांना मेट्रो हवी भूमिगत; म्युस संस्थेचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:44 IST

वडाळा ते कासारवडवलीदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो-४ च्या कामांमुळे ठाण्यात मोठ्या वाहतूककोंडीसह प्रदूषणाचा त्रास वाढल्याने ठाण्यातून मेट्रो-४ ही भूमिगत करण्याची मागणी नागरिकांच्या सर्वेक्षणामधून पुढे आली आहे.

ठाणे : वडाळा ते कासारवडवलीदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो-४ च्या कामांमुळे ठाण्यात मोठ्या वाहतूककोंडीसह प्रदूषणाचा त्रास वाढल्याने ठाण्यातून मेट्रो-४ ही भूमिगत करण्याची मागणी नागरिकांच्या सर्वेक्षणामधून पुढे आली आहे.७९ टक्के नागरिकांनी मेट्रो भूमिगत व्हावी, असे मत नोंदवले आहे. म्युस या संस्थेने ठाण्यात हा सर्व्हे केला आहे. एमएमआरडीएने मेट्रो-४ चे काम सुरू झाले असून ठाण्यातून तीनहातनाका ते कासारवडवलीपर्यंत ती धावणार आहे. तीनहातनाक्यापासून ते घोडबंदर पट्ट्यात तिचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही बाजूला बॅरिकेड्स टाकल्याने दररोज वाहतूककोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. या कामामुळे प्रदूषणामध्येही मोठी वाढ झाली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मुख्य मेट्रोचा नक्की ठाण्याला किती फायदा होणार, याचे सर्वेक्षण गेल्या आठवड्यात म्युस या सामाजिक संस्थेने ठाण्यात केले. त्यात जवळपास एक हजार लोकांना मेट्रो प्रकल्पाबाबत विचारणा केली. या सर्व्हेमध्ये ९१ टक्के नागरिकांना मेट्रो प्रकल्प काय आहे, याची माहिती आहे, तर ७९ टक्के नागरिकांना ठाण्यातून ती भूमिगत व्हावी, असे वाटते. मेट्रो भूमिगत झाल्याने प्रदूषणासह वाहतूककोंडीदेखील कमी होणार असल्याचे या नागरिकांना वाटते. हा सर्व्हे करत असताना ३४.१ टक्के नागरिकांना मेट्रोच्या स्टेशनबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे समोर आले.विशेष म्हणजे ६८.४ टक्के लोकांना मेट्रोबाबत कधी सुनावणी घेतली, याची माहितीच नसल्याचे उघड झाले. यामुळे संधी मिळाली, तर ८२.४ टक्के नागरिकांनी अजूनही मेट्रो प्रकल्पाबाबत हरकती आणि सूचना देण्याची इच्छा व्यक्त केली.एलिव्हेटेड मेट्रोला विरोधमेट्रोसाठी ठाण्यातून ४०० पेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार असून ८८.८ टक्के नागरिकांनी त्यास आपला विरोध दर्शविला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यापेक्षा नियोजनबद्ध आराखडा निर्माण करणे आवश्यक होते. ५२ टक्के नागरिकांनी ठाण्यातून एलिव्हेटेड मेट्रो करून काही उपयोग नसून आज जी वाहतूककोंडी होत आहे, ती होणारच असल्याचे सांगितले; तर ८५ टक्के नागरिकांना या प्रकल्पाची किंमतच माहीत नसल्याचे सर्व्हेमधून स्पष्ट झाले.स्वस्त बसमार्ग हवामेट्रोपेक्षा जर ठाण्यातून चांगल्या बसमार्गाची सुरुवात केली, तर ते अधिक सोयीचे होणार असल्याचे ५८.२ टक्के नागरिकांना वाटते. मेट्रोच्या भाड्यापेक्षा कमी भाडे असलेला बसमार्ग सुरू केल्यास ते सयुक्तिक ठरेल असे नागरिकांना वाटते.

टॅग्स :Metroमेट्रोthaneठाणे