शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना मेट्रो हवी भूमिगत; म्युस संस्थेचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:44 IST

वडाळा ते कासारवडवलीदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो-४ च्या कामांमुळे ठाण्यात मोठ्या वाहतूककोंडीसह प्रदूषणाचा त्रास वाढल्याने ठाण्यातून मेट्रो-४ ही भूमिगत करण्याची मागणी नागरिकांच्या सर्वेक्षणामधून पुढे आली आहे.

ठाणे : वडाळा ते कासारवडवलीदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो-४ च्या कामांमुळे ठाण्यात मोठ्या वाहतूककोंडीसह प्रदूषणाचा त्रास वाढल्याने ठाण्यातून मेट्रो-४ ही भूमिगत करण्याची मागणी नागरिकांच्या सर्वेक्षणामधून पुढे आली आहे.७९ टक्के नागरिकांनी मेट्रो भूमिगत व्हावी, असे मत नोंदवले आहे. म्युस या संस्थेने ठाण्यात हा सर्व्हे केला आहे. एमएमआरडीएने मेट्रो-४ चे काम सुरू झाले असून ठाण्यातून तीनहातनाका ते कासारवडवलीपर्यंत ती धावणार आहे. तीनहातनाक्यापासून ते घोडबंदर पट्ट्यात तिचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी दोन्ही बाजूला बॅरिकेड्स टाकल्याने दररोज वाहतूककोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. या कामामुळे प्रदूषणामध्येही मोठी वाढ झाली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर मुख्य मेट्रोचा नक्की ठाण्याला किती फायदा होणार, याचे सर्वेक्षण गेल्या आठवड्यात म्युस या सामाजिक संस्थेने ठाण्यात केले. त्यात जवळपास एक हजार लोकांना मेट्रो प्रकल्पाबाबत विचारणा केली. या सर्व्हेमध्ये ९१ टक्के नागरिकांना मेट्रो प्रकल्प काय आहे, याची माहिती आहे, तर ७९ टक्के नागरिकांना ठाण्यातून ती भूमिगत व्हावी, असे वाटते. मेट्रो भूमिगत झाल्याने प्रदूषणासह वाहतूककोंडीदेखील कमी होणार असल्याचे या नागरिकांना वाटते. हा सर्व्हे करत असताना ३४.१ टक्के नागरिकांना मेट्रोच्या स्टेशनबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे समोर आले.विशेष म्हणजे ६८.४ टक्के लोकांना मेट्रोबाबत कधी सुनावणी घेतली, याची माहितीच नसल्याचे उघड झाले. यामुळे संधी मिळाली, तर ८२.४ टक्के नागरिकांनी अजूनही मेट्रो प्रकल्पाबाबत हरकती आणि सूचना देण्याची इच्छा व्यक्त केली.एलिव्हेटेड मेट्रोला विरोधमेट्रोसाठी ठाण्यातून ४०० पेक्षा अधिक झाडांची कत्तल होणार असून ८८.८ टक्के नागरिकांनी त्यास आपला विरोध दर्शविला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यापेक्षा नियोजनबद्ध आराखडा निर्माण करणे आवश्यक होते. ५२ टक्के नागरिकांनी ठाण्यातून एलिव्हेटेड मेट्रो करून काही उपयोग नसून आज जी वाहतूककोंडी होत आहे, ती होणारच असल्याचे सांगितले; तर ८५ टक्के नागरिकांना या प्रकल्पाची किंमतच माहीत नसल्याचे सर्व्हेमधून स्पष्ट झाले.स्वस्त बसमार्ग हवामेट्रोपेक्षा जर ठाण्यातून चांगल्या बसमार्गाची सुरुवात केली, तर ते अधिक सोयीचे होणार असल्याचे ५८.२ टक्के नागरिकांना वाटते. मेट्रोच्या भाड्यापेक्षा कमी भाडे असलेला बसमार्ग सुरू केल्यास ते सयुक्तिक ठरेल असे नागरिकांना वाटते.

टॅग्स :Metroमेट्रोthaneठाणे