शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

बिल्डरहितासाठी जि.प.ची कन्याशाळा बंद करण्याचा डाव, बी.जे. हायस्कूलचा ठाणे मनपात समायोजनेचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 03:12 IST

- सुरेश लोखंडेठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन बी.जे. हायस्कूल आणि कन्या शाळा या दोन्ही हायस्कूलमध्ये सुमारे ७० इतक्या अत्यल्प उपस्थितीमुळे या दोन्ही शाळा एकत्र करून एक हायस्कूल सुरू ठेवायची की, त्यांना ठाणे महापालिकेच्या शाळेत समाविष्ट करून घ्यायचे, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात या ...

- सुरेश लोखंडेठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन बी.जे. हायस्कूल आणि कन्याशाळा या दोन्ही हायस्कूलमध्ये सुमारे ७० इतक्या अत्यल्प उपस्थितीमुळे या दोन्ही शाळा एकत्र करून एक हायस्कूल सुरू ठेवायची की, त्यांना ठाणे महापालिकेच्या शाळेत समाविष्ट करून घ्यायचे, यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात या दोन्ही शाळा असून त्यांच्या जमिनीला आज कोट्यवधींची किंमत आहे. या कोट्यवधींच्या जमिनीवर डोळा ठेवून खासगीकरणाचा आधार घेऊन ही जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा काही राज्यकर्ते आणि अधिकाऱ्यांचा डाव असून त्यासाठीच अत्यल्प पटसंख्येच्या नावाखाली कन्याशाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचे महापालिका शाळेत समायोजन करण्याचे घाटत असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या बी.जे. हायस्कूलच्या नव्या इमारतीचे काम सुरू असून ती काही वर्षांपासून कन्याशाळेच्या वास्तूत भरते. सकाळी भरणाºया या बी.जे. हायस्कूलच्या पटावर ६३ विद्यार्थी आहेत. पण, प्रत्यक्षात सुमारे ४० ते ४२ विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळते. याच वास्तूत कन्याशाळा दुपारच्या सत्रात भरते. तिच्या पटावर ६६ विद्यार्थिनी आहेत. मात्र, केवळ ३० ते ३८ विद्यार्थिनींची वर्गात रोजची उपस्थिती असते. ठाणे जिल्हा परिषदेच्या या दोन्ही हायस्कूलमध्ये पाचवी ते दहावीचे वर्ग आहेत. पण, दोन्ही शाळांची विद्यार्थी संख्या सुमारे ७० च्या जवळपास आहे. या दोन्ही शाळांत अल्प विद्यार्थी संख्या आहे. यामुळे कन्याशाळा बी.जे. हायस्कूलमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर, हे बी.जे. हायस्कूल बांधलेल्या नवीन इमारतीत सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.या हालचालींसंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा शासनाचा तसा जीआर आहे. त्यास अनुसरून या शाळांचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू आहे. जूनपर्यंत ते पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बढे म्हणाले. कन्याशाळेची इमारतही ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती आता धोकादायक झाली. या शाळेचा वरचा मजला आधीच पाडून इमारतीचा भार कमी केला आहे. धोकादायक नसलेल्या वर्गखोल्यांत दोन्ही हायस्कूल दोन सत्रांत वास्तूमध्ये सुरू आहे.जि.प.ला शहरातील शाळा डिजिटल करता आल्या नाहीतइमारत जीर्ण झाल्यामुळे कन्याशाळेची वास्तू पाडण्याचाही प्रयत्न सुरू आहे. यानंतर, त्यावर काय बांधणार, यावर मात्र प्रशासनाकडून काहीच सांगितले जात नाही. ग्रामीण भागातील एक हजार ३६३ शाळा डिजिटल केल्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेचे मात्र शहरातील या दोन हायस्कूलकडे दुर्लक्ष झाले.यामुळे येथील विद्यार्थी संख्या रोडावली. शहरातील अन्य शाळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. ग्रामीणमधील १० शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंदही कराव्या लागल्या.मात्र, ही नामुश्की पचवण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ९५० शाळा प्रगत केल्याचा दावा आहे. परंतु, जिल्हा परिषद इमारतीला लागून असलेल्या कन्याशाळा प्रगतही करता आली नाही आणि विद्यार्थी संख्याही जिल्हा परिषदेला वाढवता आलेली नाही.कन्याशाळेच्या केवळ भूखंडाच्या श्रीखंडावर लक्षब्रिटिशकालीन असलेल्या या कन्याशाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्याची गरज होती व आहे. पण, केवळ महिला व मुलींचे सबलीकरण करण्याच्या घोषणा करणाºया प्रशासनाला गरीब, दीनदलितांच्या मुलींच्या कन्याशाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारता आला नाही. भले मोठे प्रांगण असलेल्या या शाळेला सुसज्ज करता आले नाहे.‘बेटी पढाव और बेटी बचाव’ असे शासनाचे उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद शहरातील या कन्याशाळेलाडिजिटल करू शकली नाही. शहराच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणच्या या शाळेच्या भूखंडावर लक्ष केंद्रित करून आगामी सहा महिन्यांत ही कन्याशाळा तोडण्याचे प्रयत्न आहेत.यामुळे शहरातील हक्काच्या शाळेपासून या सावित्रीच्या लेकी वंचित होतील. त्यांना हक्काचे शिक्षण महागड्या शाळेत घेणे शक्य होणार नसल्याने त्यांच्या पालकांसमोर नवे संकट उभे राहणार आहे.

टॅग्स :Schoolशाळाthaneठाणे