शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ठाणे ग्रामीण पोलिसांनी ४५ फिर्यादींना हस्तांतरीत केला एक कोटी २५ लाखांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:00 IST

ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीणमधील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील रोकड आणि दागिन्यांसह सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यावेळी सेवापदके परत मिळाल्याने लष्कारातील माजी अधिकारीही भावूक झाला होता.

ठळक मुद्देचोरीतील सेवापदके परत मिळाल्याने लष्करातील अधिकारी झाला भावूक दागिनेही पुन्हा मिळाल्याने किन्हवलीची गृहिणीही भारावली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चोरी आणि जबरी चोरीतील एक कोटी २५ लाख ६९ हजार ८३६ रुपयांचा ऐवज ४५ फिर्यादींना ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते मंगळवारी अभिहस्तांतरण करण्यात आला. जबरी चोरीतील पदके आणि दोन लाखांची रक्कम पोलिसांनी परत केल्यानंतर लष्कारातील माजी अधिकारी सनी थॉमस यांनी समाधान व्यक्त करतांनाच भावूक झाले होते.ठाणे ग्रामीणमधील विविध पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मालमत्तेच्या गुन्हयांमधील जप्त केलेला ऐवज संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यासाठी ७ जानेवारी रोजी मुद्देमाल वितरण सोहळयाचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या वित्तक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे ग्रामीण जिल्हयातील १२ पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्हयातील सोन्याचे दागिने (मंगळसूत्रे, सोनसाखळी, कर्णफुले, बे्रसलेट, कानाच्या रिंगा, झुमके आणि इतर ) तसेच चोरीस गेलेली मोटारसायकल, मोबाईल आणि रोकड असा सुमारे सव्वा कोटीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.

यावेळी मौल्यवान मंगळसूत्रांसह मौल्यवान दागिने, मोबाईल, मोटारसायकली आणि रोकड परत मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. अंबरनाथ येथील कुळगाव येथील रहिवाशी असेलेले सैन्य दलातून निवृत्त झालेले लेफ्टनंट सनी थॉमस यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. थॉमस यांनी भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपली सेवा बजावल्याने त्यांना चांगल्या कामगिरीबद्दलची सेवा पदके मिळाली होती. त्यांच्याकडे झालेल्या या मौल्यवान पदकांसह दोन लाखांची रोकड असा दोन लाख ३५ हजारांचा ऐवज चोरीस गेला होता. ही चोरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने अवघ्या चार दिवसात उघडकीस आणली होती. या प्रकरणात नवी मुंबईतून तिघा आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीतील पदकांसह सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. आयुष्यात आपण काहीच कमावले नाही. पण निवृत्तीनंतर मिळालेली दोन लाखांची जमा पुंजी समाजकार्यासाठी उपयोगात आणायची होती. शिवाय भारत पाक सीमेमवर बजावलेल्या कर्तव्यापोटी केंद्र सरकारकडून मिळालेले पदक हीच एक मोठी संपत्ती होती. तीही चोरी झाली होती. ती पुन्हा मिळवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक आंधळे यांच्या पथकाचा आपल्याला अभिमान आहे. पोलीस मेहनत घेऊन गुन्हा कसा उघडकीस आणतात याचा चांगला अनुभव आल्याचे सांगतांनाच त्यांना गहिवरुन आले. तसेच घरातील चोरीतून चोरटयांनी आयुष्यभराची कमाई चोरुन नेली होती. पोलिसांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा सर्व साडे चार तोळयांचा ८८ हजारांचा ऐवज परत मिळवून दिल्याचे किन्हवली येथील वैशाली देशमुख यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. देशमुख यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. तिचा किन्हवली पोलिसांनी यशस्वी तपास केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक नाईक, मीरा रोडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शांताराम वळवी, पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

नोकरांना काम देतांना काळजी घ्या- डॉ. राठोडआपल्या मालमत्तेची कशा प्रकारे सुरक्षा घ्यायची याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोसायटीच्या आवारात सीसीटीव्ही तसेच अनोळखी व्यक्तीला कोणतेही काम देतांना किंवा नोकरीवर ठेवतांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी आवश्यक सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी बाहेरगावी जातांना आपल्या घराची कशा प्रकारे सुरक्षा घ्यावयाची याबाबत अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस