शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

ठाणे एकात झाले पास, दुसऱ्यात एकदम नापास..!

By अजित मांडके | Updated: January 29, 2024 13:28 IST

Thane: ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणावे लागेल. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने हे अधोरेखित केले आहे. 

- अजित मांडके (प्रतिनिधी)

ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणावे लागेल. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने हे अधोरेखित केले आहे. शहरात रस्त्यांची, गृहसंकुलांची, मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने शहराच्या विविध भागांत वाहतूककोंडी होत असून, त्यामुळे वाहनांच्या हॉर्नमधून ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. शांतता क्षेत्रातही ध्वनीपातळी वाढली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यात महापालिका कमी पडली का? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठाणे शहर हे औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेले शहर आहे. १८६३ मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली तेव्हा शहराची लोकसंख्या नऊ हजार होती. जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाख ३७ हजार एवढी आहे. शहरात मागील काही वर्षांत विकासकामे झपाट्याने सुरू झाली. मोठमोठी गृहसंकुले उभी राहू लागली, त्यात घोडबंदर भागात मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे दिवसरात्र सुरू आहेत. शहरातील वाहनांची संख्या २५ लाखांहून अधिक आहे. दरवर्षी रस्त्यांवर येणाऱ्या नवीन वाहनांची संख्या ८ ते १० टक्क्यांंनी वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना शहरातील रस्त्यांचा आकार तोच आहे. शहरातील अनेक रस्त्यांची रुंदी कमी आहे, ठाणे शहरातून मुंबई, गुजरात, नाशिक, भिवंडी या ठिकाणी जाता येत असल्याने रोज शहरातील रस्त्यांवर लाखो वाहने ये-जा करतात. 

घोडबंदर भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे सकाळपासून वाहतूककोंडी सुरू होते, ती रात्री १० नंतरही तशीच असल्याचे चित्र माजिवडा, मानपाडा, कापूरबावडी, पातलीपाडा आदी भागांत दिसून येते. सायंकाळी वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे अक्षरश: डोके ठणकायला लागते. त्यावर महापालिका किंवा वाहतूक पोलिसांना अंकुश लावता आलेला नाही. वाहतूककोंडी, विनाकारण हॉर्न वाजवल्यामुळे, बांधकामाची कामे सुरू असल्याने, सण-उत्सवानिमित्त मोठ्या आवाजात वाजणारे डीजे आदींमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे. महापालिकेने शहरातील २० चौकांचे सर्वेक्षण केले, त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. 

गणेशोत्सव व दीपावलीच्या काळात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता ही मर्यादेपेक्षाही अधिक आढळून आली आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे उपाय केले जात असल्याचा दावा केला जातो. परंतु त्याची अंमलबजावणी कुठेही होताना  दिसत नाही.  उलट ध्वनी प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच महापालिका हवा प्रदूषण रोखण्यात पास  झाली असली, तरी ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापास झाली, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :thaneठाणे