शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

ठाणे एकात झाले पास, दुसऱ्यात एकदम नापास..!

By अजित मांडके | Updated: January 29, 2024 13:28 IST

Thane: ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणावे लागेल. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने हे अधोरेखित केले आहे. 

- अजित मांडके (प्रतिनिधी)

ठाणे महापालिकेने हवा आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्याने आता कुठे शहराची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. हवा प्रदूषणात पास झालेली ठाणे महापालिका ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापासच झाल्याचे म्हणावे लागेल. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाने हे अधोरेखित केले आहे. शहरात रस्त्यांची, गृहसंकुलांची, मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने शहराच्या विविध भागांत वाहतूककोंडी होत असून, त्यामुळे वाहनांच्या हॉर्नमधून ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. शांतता क्षेत्रातही ध्वनीपातळी वाढली आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यात महापालिका कमी पडली का? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठाणे शहर हे औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर असलेले शहर आहे. १८६३ मध्ये नगर परिषदेची स्थापना झाली तेव्हा शहराची लोकसंख्या नऊ हजार होती. जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाख ३७ हजार एवढी आहे. शहरात मागील काही वर्षांत विकासकामे झपाट्याने सुरू झाली. मोठमोठी गृहसंकुले उभी राहू लागली, त्यात घोडबंदर भागात मेट्रोच्या कामाने वेग घेतला आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे दिवसरात्र सुरू आहेत. शहरातील वाहनांची संख्या २५ लाखांहून अधिक आहे. दरवर्षी रस्त्यांवर येणाऱ्या नवीन वाहनांची संख्या ८ ते १० टक्क्यांंनी वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना शहरातील रस्त्यांचा आकार तोच आहे. शहरातील अनेक रस्त्यांची रुंदी कमी आहे, ठाणे शहरातून मुंबई, गुजरात, नाशिक, भिवंडी या ठिकाणी जाता येत असल्याने रोज शहरातील रस्त्यांवर लाखो वाहने ये-जा करतात. 

घोडबंदर भागात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे सकाळपासून वाहतूककोंडी सुरू होते, ती रात्री १० नंतरही तशीच असल्याचे चित्र माजिवडा, मानपाडा, कापूरबावडी, पातलीपाडा आदी भागांत दिसून येते. सायंकाळी वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे अक्षरश: डोके ठणकायला लागते. त्यावर महापालिका किंवा वाहतूक पोलिसांना अंकुश लावता आलेला नाही. वाहतूककोंडी, विनाकारण हॉर्न वाजवल्यामुळे, बांधकामाची कामे सुरू असल्याने, सण-उत्सवानिमित्त मोठ्या आवाजात वाजणारे डीजे आदींमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात काढण्यात आला आहे. महापालिकेने शहरातील २० चौकांचे सर्वेक्षण केले, त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. 

गणेशोत्सव व दीपावलीच्या काळात ध्वनी प्रदूषणाची तीव्रता ही मर्यादेपेक्षाही अधिक आढळून आली आहे. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे उपाय केले जात असल्याचा दावा केला जातो. परंतु त्याची अंमलबजावणी कुठेही होताना  दिसत नाही.  उलट ध्वनी प्रदूषणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच महापालिका हवा प्रदूषण रोखण्यात पास  झाली असली, तरी ध्वनी प्रदूषण रोखण्यात नापास झाली, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :thaneठाणे