शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

ठाणे-पालघर जिल्ह्यांत पाच वर्षांत ४०९३ बालमृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 11:36 PM

बेकारी, दारिद्रय, पिण्यास शुद्ध पाणी नसणे, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, आरोग्यसुविधा नसण्यासह पोटाची भूक भागवता न आल्याने हे मृत्यू होत आहेत.

- नारायण जाधवठाणे : मुंबईच्या कुशीत असलेली आणि राजधानीची तहान भागवणारी १० धरणे असलेल्या ठाणे-पालघर या दोन्ही जिल्ह्यांत गेल्या पाच वर्षांत पोषण आहारावर दीडशे कोटींचा निधी खर्च होऊन तब्बल ४०९३ बालमृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत १५०६ बालमृत्यू झाल्याची नोंद जि.प.च्या महिला व बालविकास विभागाच्या दप्तरी आहे. शिवाय, सध्या सॅमची ६८ तर मॅमची ८८२ बालके आढळली आहेत. तर, पालघर जिल्ह्यात पाच वर्षांत २५८७ बालमृत्यू झाले आहेत.बेकारी, दारिद्रय, पिण्यास शुद्ध पाणी नसणे, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, आरोग्यसुविधा नसण्यासह पोटाची भूक भागवता न आल्याने हे मृत्यू होत आहेत.यंदाच्या एप्रिल २०१९ मध्ये सॅमच्या १६३ आणि मॅमच्या १७९६ बालकांची नोंद झाली आहे. मात्र, शासनदरबारी बालमृत्यूंची नोंद ही कुपोषणाने नव्हे, तर न्यूमोनिया, डायरिया व तत्सम आजाराने झाल्याचे भासवले जात असल्याने कोवळी पानगळ दरवर्षी या निष्ठूरतेमुळे झडतच आहे.

पोषण आहारावर पाच वर्षांत दीडशे कोटीठाणे जिल्ह्यात बालकांच्या नियमित आहारावर गेल्या पाच वर्षांत ७९ कोटी ७९ लाख सहा हजार रुपये खर्च झाले आहेत. विशेष म्हणजे २०१४-१५ मध्ये ३४ कोटी ८२ लाख ८६ हजार असलेला निधी २०१८-१९ मध्ये नऊ कोटी १८ लाख ४६ हजारांवर आला आहे.पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ७० कोटी ३२ लाख ९९ हजार खर्च झाले आहेत. यात २०१५-१६ मध्ये एक कोटी १२ लाख ९१ हजार, तर २०१८-१९ मध्ये २० कोटी ८६ लाख ४१ हजार, तर २०१९-२० मध्ये एप्रिल अखेरपर्यंत सहा कोटी ६६ लाख ६७ हजार रुपये खर्च झालेले आहेत.६९३ अंगणवाड्यांत शौचालयच नाहीपालघर जिल्ह्यातील ३१८३ अंगणवाड्यांपैकी २००५ अंगणवाड्यांची स्वत:ची वास्तू असून ५८४ अंगणवाड्या भाड्याच्या घरांत भरत आहेत. त्यातील ५७६ अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिला व बालविकास विभागाची आकडेवारीच सांगते. शिवाय, ६९३ अंगणवाड्यांत शौचालय नसल्याने तेथील बालकांना उघड्यावरच आपला नैसर्गिक विधी उरकावा लागत आहे. त्यामुळे दुर्गमपाड्यांतील अंगणवाडीसेविकांची मोठी कुचंबणा होत आहे.

टॅग्स :thaneठाणे