शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

दिव्यात ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाणे पालिकेच्या शाळेतील प्रकार, माध्यान्ह भोजनानंतर झाला त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:34 IST

दिवा आगासन येथे पालिकेची ८८ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो. या आहारातून गुरुवारी विषबाधा झाली. ठाणे पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी दिली जाते.

ठाणे : कळवा येथील शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली असतानाच गुरुवारी दिव्यातील पालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मधील ३९ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. ही मुले सहावी इयत्तेत शिकत असून, त्यांच्यावर सध्या ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, त्यातील ११ मुलांना पोटदुखीचा त्रास वाढला असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

दिवा आगासन येथे पालिकेची ८८ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो. या आहारातून गुरुवारी विषबाधा झाली. ठाणे पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी दिली जाते. मात्र, खिचडीचा दर्जा तपासला जात नाही. त्यात पाल असल्याचा दावा येथील स्थानिक रोहिदास मुंडे यांनी केला आहे. तीच खिचडी विद्यार्थ्यांनी खाल्ली आणि त्यातून त्यांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास झाला. खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या ४४ विद्यार्थ्यांना याचा  त्रास जाणवला. त्यानंतर  तत्काळ याची सूचना पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर ठाणे पालिकेकडून डॉक्टरांचे पथक  शाळेत दाखल झाले. यावेळी सहा डॉक्टरांचे पथक, दोन नर्स आणि तीन रुग्णवाहिका खबरदारीच्या दृष्टीने शाळेत दाखल झाल्या. त्यांनी या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. या ३९ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवत होता. 

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली असून, संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अन्नाचे नमुने घेतले व संपूर्ण किचनची व परिसराची पाहणी केली, असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाSchoolशाळाStudentविद्यार्थी