शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

दिव्यात ३९ विद्यार्थ्यांना विषबाधा; ठाणे पालिकेच्या शाळेतील प्रकार, माध्यान्ह भोजनानंतर झाला त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:34 IST

दिवा आगासन येथे पालिकेची ८८ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो. या आहारातून गुरुवारी विषबाधा झाली. ठाणे पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी दिली जाते.

ठाणे : कळवा येथील शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली असतानाच गुरुवारी दिव्यातील पालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मधील ३९ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. ही मुले सहावी इयत्तेत शिकत असून, त्यांच्यावर सध्या ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु, त्यातील ११ मुलांना पोटदुखीचा त्रास वाढला असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

दिवा आगासन येथे पालिकेची ८८ क्रमांकाची शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार दिला जातो. या आहारातून गुरुवारी विषबाधा झाली. ठाणे पालिकेच्या शाळेला सकस आहार म्हणून खिचडी दिली जाते. मात्र, खिचडीचा दर्जा तपासला जात नाही. त्यात पाल असल्याचा दावा येथील स्थानिक रोहिदास मुंडे यांनी केला आहे. तीच खिचडी विद्यार्थ्यांनी खाल्ली आणि त्यातून त्यांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास झाला. खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या ४४ विद्यार्थ्यांना याचा  त्रास जाणवला. त्यानंतर  तत्काळ याची सूचना पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर ठाणे पालिकेकडून डॉक्टरांचे पथक  शाळेत दाखल झाले. यावेळी सहा डॉक्टरांचे पथक, दोन नर्स आणि तीन रुग्णवाहिका खबरदारीच्या दृष्टीने शाळेत दाखल झाल्या. त्यांनी या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. या ३९ विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवत होता. 

सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली असून, संबंधित विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अन्नाचे नमुने घेतले व संपूर्ण किचनची व परिसराची पाहणी केली, असे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाSchoolशाळाStudentविद्यार्थी