शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

ठाणे जिल्ह्यात मत मोजणीच्या सर्वाधिक ३४ फेऱ्या मुरबाडला; सर्वात कमी २० फेऱ्या उल्हासनगरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 8:03 PM

या मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एक केंद्रीय निरीक्षक असून जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवरील १८ केंद्रीय निरीक्षकांच्या नियंत्रणात मतमोजणी होणार आहेत. नऊ हजार पोलिस बंदोबस्तासह ११ एसआरपीएफ व सीआरपीएफच्या तुकड्या या मतमोजणी केंद्रांवर आहेत. मतमोजणी केंद्रावर अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात २१२ उमेदवार३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी (४७.९१ टक्के) २१२ उमेदवारांना मतदान केलेविजयी उमेदवार दुपारी २ वाजे आत निश्चित होण्याची शक्यता एका राऊंडला जास्तीत जास्त अर्धा तास

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांपैकी ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी (४७.९१ टक्के) २१२ उमेदवारांना मतदान केले आहे. ठिकठिकाणच्या १८ मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी २४ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल. एक राऊंड पूर्ण होण्यासाठी तब्बल अर्धा तास लागणार आहे. यानुसार सर्वाधिक मुरबाड येथील मतमोजणी ३४ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. तर उल्हासनगरला सर्वात कमी म्हणजे २० फेऱ्यांमध्येही मतमोजणी होणार आहे.         जिल्ह्यातील ३० लाख ६२ हजार ५४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १७ लाख ३२ हजार ९१२ पुरूषांसह १३ लाख २९ हजार ४८७ महिला आणि १४५ इतर मतदारांनी मतदान केले आहे. या २१२ उमेदवारांपैकी विजयी उमेदवार  दुपारी २ वाजेच्या आत निश्चित होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात झालेले एकूण मतदान, तेथील उमेदवार, एकूण ईव्हीएम आदींचा विचार करता एका राऊंडला जास्तीत जास्त अर्धा तास लागणार आहे. १८ विधानसभाच्या मतमोजणीपैकी सर्वात जास्त ३४ फेऱ्यामध्ये मुरबाड मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.यानुसार अन्यही १६ मतदारसंघात मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत. तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी २० फेऱ्यामध्ये मतमोजणी पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.        जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी १८ मतमोजणी केंद्रावर होणार आहे. या प्रत्येक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी १४ टेबल लावण्यात आले आहे. त्यावर १२० कर्मचारी आहेत. यानुसार जिल्ह्यात एक हजार २०० कर्मचारी या १८ मतदान केंद्रांवर तैनात आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्याव्दारे अत्यंत पारदर्शीपणाने व अचूकतेने मतमोजणी करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसरी फेरीची मतमोजणी सुरू करण्याचे नियोजन आहे. सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.

        या मतमोजणीसाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर एक केंद्रीय निरीक्षक असून जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रांवरील १८ केंद्रीय निरीक्षकांच्या नियंत्रणात मतमोजणी होणार आहेत. नऊ हजार पोलिस बंदोबस्तासह ११ एसआरपीएफ व सीआरपीएफच्या तुकड्या या मतमोजणी केंद्रांवर आहेत. मतमोजणी केंद्रावर अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.