शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

ठाणे जिल्हा परिषद निवडणूक,  मतमोजणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 11:18 IST

जमेल तशी राजकीय तडजोड करत शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली.

ठाणे - जमेल तशी राजकीय तडजोड करत शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली. थोड्याच वेळात कल हाती येऊ लागतील. छाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसाठी ही निवडणूक झाली. त्यातील खोणी गटात काँग्रेसचा उमेदवार विनविरोध निवडून आला आहे.

त्याचबरोबर भिवंडी (४२ गण), शहापूर २८ गण), मुरबाड (१६ गण), कल्याण (१२ गण) आणि अंबरनाथ (८ गण) या पंचायत समित्यांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातील शेलार आणि कोलीवली या दोन गणांत चुकीच्या मतपत्रिका वाटल्या गेल्याने तेथे फेरमतदान होणार आहे. त्यामुळे या १०६ पैकी १०४ गणांचीच मतमोजणी पार पडणार आहे.

बुधवारी त्यासाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाले होते. भिवंडी तालुक्यातील काल्हेरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणीमारीमुळे ही निवडणूक चर्चेत आली होती. 

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवा जिल्हा अस्तित्वात आल्यावर त्यावेळची जिल्हा परिषद विसर्जित झाली होती. त्यानंतर तेथे निवडणूक जाहीर झाली, पण कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मुद्दा आणि काही ग्रामपंचायतींच्या नगर पंचायती करण्याच्या मागणीवरून बहिष्कार घातल्याने ही निवडणूक पुढे गेली. नंतर न्यायालयीने वादामुळे ती लांबत गेली आणि आता जवळपास सव्वातीन वर्षांनी ती पार पडते आहे. 

शिवसेनेला सोबत घेत आदिवासींचे राजकारण करणारे विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेला फोडून भाजपाने त्यांचा पाठिंबा मिळवला. शिवाय रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट त्यांच्या सोबत आहे. भाजपाने आक्रमकपणे इतर पक्षांतील निवडून येण्याच्या क्षमतेते उमेदवार फोडल्याने अन्य पक्ष एकत्र आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जागावाटप केले. त्यांना काही ठिकाणी काँग्रेसने साथ दिली. कुणबी सेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. रिपब्लिकन पक्षाचा सेक्यूलर गट त्यांच्यासोबत गेला. त्या पार्श्वभूमीवर या नव्या राजकीय समीकरणांना मतदार कसा प्रतिसाद देतात ते गुरूवारच्या मतमोजणीतून थोड्याच वेळात समजेल. 

भाजपाचे खासदार कपिल पाटील, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण मतदार आणि शेतकरी नेमका काय कौल देतात यावर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरणार आहे.  

टॅग्स :thaneठाणे