शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

ठाणे जिल्हा परिषद निवडणूक,  मतमोजणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 11:18 IST

जमेल तशी राजकीय तडजोड करत शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली.

ठाणे - जमेल तशी राजकीय तडजोड करत शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली. थोड्याच वेळात कल हाती येऊ लागतील. छाणे जिल्हा परिषदेच्या ५३ गटांसाठी ही निवडणूक झाली. त्यातील खोणी गटात काँग्रेसचा उमेदवार विनविरोध निवडून आला आहे.

त्याचबरोबर भिवंडी (४२ गण), शहापूर २८ गण), मुरबाड (१६ गण), कल्याण (१२ गण) आणि अंबरनाथ (८ गण) या पंचायत समित्यांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातील शेलार आणि कोलीवली या दोन गणांत चुकीच्या मतपत्रिका वाटल्या गेल्याने तेथे फेरमतदान होणार आहे. त्यामुळे या १०६ पैकी १०४ गणांचीच मतमोजणी पार पडणार आहे.

बुधवारी त्यासाठी सुमारे ६५ टक्के मतदान झाले होते. भिवंडी तालुक्यातील काल्हेरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणीमारीमुळे ही निवडणूक चर्चेत आली होती. 

ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवा जिल्हा अस्तित्वात आल्यावर त्यावेळची जिल्हा परिषद विसर्जित झाली होती. त्यानंतर तेथे निवडणूक जाहीर झाली, पण कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा मुद्दा आणि काही ग्रामपंचायतींच्या नगर पंचायती करण्याच्या मागणीवरून बहिष्कार घातल्याने ही निवडणूक पुढे गेली. नंतर न्यायालयीने वादामुळे ती लांबत गेली आणि आता जवळपास सव्वातीन वर्षांनी ती पार पडते आहे. 

शिवसेनेला सोबत घेत आदिवासींचे राजकारण करणारे विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेला फोडून भाजपाने त्यांचा पाठिंबा मिळवला. शिवाय रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट त्यांच्या सोबत आहे. भाजपाने आक्रमकपणे इतर पक्षांतील निवडून येण्याच्या क्षमतेते उमेदवार फोडल्याने अन्य पक्ष एकत्र आले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत जागावाटप केले. त्यांना काही ठिकाणी काँग्रेसने साथ दिली. कुणबी सेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला. रिपब्लिकन पक्षाचा सेक्यूलर गट त्यांच्यासोबत गेला. त्या पार्श्वभूमीवर या नव्या राजकीय समीकरणांना मतदार कसा प्रतिसाद देतात ते गुरूवारच्या मतमोजणीतून थोड्याच वेळात समजेल. 

भाजपाचे खासदार कपिल पाटील, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, शांताराम मोरे, पांडुरंग बरोरा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण मतदार आणि शेतकरी नेमका काय कौल देतात यावर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा ठरणार आहे.  

टॅग्स :thaneठाणे