शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे: राजकारण रंगतदार वळणावर , शिवसेना-भाजपा दोघांचाही राष्ट्रवादीसोबत सत्तेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:17 IST

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केल्याने राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे.

ठाणे/भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी केल्याने राजकारण रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे.भाजपापुरस्कृत अपक्षाला शिवेसेनेने पक्षात घेण्याची खेळी केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडली, तेवढीच राष्ट्रवादीत नाराजी पसरली. त्याचा फायदा घेत भाजपाने वरिष्ठ नेत्यांना मध्यस्थी करायला लावत राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या गोटात वळवण्याचा प्रयत्न सुरू केला. भाजपाच्या नेत्यांनी अशा वाटाघाटी सुरू असल्याचे उघड केल्याने सत्ता स्थापन होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला कधी नव्हे, एवढे महत्त्व आले आहे.शिवसेनेचे ठाणे ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी शिवसेनेला स्वबळावर बहुमत मिळाले, तरी राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीलाही सत्तेत सहभागी करून घेणार असल्याची आमची भूमिका कायम आहे, असेही त्यांनी सांगितले. त्या पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळ््यामामा यांनी तर खासदार कपिल पाटील यांच्यावर फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांनी पराभव मान्य करायला हवा. सत्तेत आम्हीच असू, हे पाटील यांनी स्वीकारावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.राष्ट्रवादीचे स्थानिक नेते इरफान भुरे यांनीही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले. त्यामुळे ते एकत्र सत्तेत असतील, असा विश्वास व्यक्त केला. भाजपासोबत जाण्याचा विचार नसल्याचे सांगताना आम्ही एकत्र काम करत राहू, असे त्यांनी सांगितले.भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख दयानंद चोरघे यांनी मात्र पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीशी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे मान्य केले. ठाणे जिल्ह्याचा, ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी निधी आणण्याचे काम भाजपाच करू शकते, याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीसाठी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत.शेलारला आले महत्त्व-निकाल लागताच लगेचच भिवंडीतील शेलार गटातील आणि शेलार, कोलिवली या गणात फेरमतदान होणार होते. मात्र त्याची तारीख निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेली नाही. भाजपाने आपला पुरस्कृत अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र आणले. काँग्रेसच्या सदस्याचे मन वळवले, तर त्यांना एका जागेची गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्या आशा शेलार गटावर केंद्रित झाल्या आहेत. या रंगतदार राजकारणामुळे शेलार गटातील फेरमतदानाला महत्त्व आले आहे.

टॅग्स :thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा