शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द, ठाणेकरांसाठी आनंद वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 4:25 PM

मागील काही दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे ठाणेकरांची पाणी कपात तुर्तास रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरली आहे.

ठळक मुद्देबुधवारी केली जात होती कपातपावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा कपात

ठाणे - मागील काही महिने ठाणेकरांचे पाण्याविना हाल सुरु होते. परंतु आता पावसाने ठाण्यासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने ठाणे शहराची पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा पाणी कपात केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी ठाणेकरांना जोपर्यंता पाऊस आहे, तो पर्यंत पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही.              ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील पाणी पुरवठा हा बुधवार ते गुरुवार असा २४ ते ३० तास बंद ठेवण्यात येत होता. यंदा तर ही पाणी कपात सप्टेंबर २०१८ पासूनच लागू करण्यात आली होती. सुरवातीला १४ टक्के त्यानंतर २० टक्के आणि आता तब्बल ३० टक्के पाणी कपात ठाणे शहरात केली जात होती. परंतु त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात होता. पाण्याच्या या कपातीवरुन महासभेतही अनेक वेळा आवाज उठविण्यात आला होता. पाण्यासाठी आंदोलनही झाल्याचे पहावयास मिळाले होते.दरम्यान आता मागील काही दिवसापासून ठाण्यासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस असा पडत राहिला तर धरणांच्या पातळीतही लवकरच वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु मागील काही दिवसापासून पावसाने लावलेल्या सततच्या हजेरीमुळे शहरातील पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे. जो पर्यंत पावसाची अशीच कृपा राहिल तो पर्यंत कपात होणार नसल्याचेही पालिकेच्या सुत्रांचे म्हणने आहे. अद्याप धरणांच्या पातळीत वाढ झालेली नाही, तलावांमध्येही पुरेसा पाणी साठा नाही. परंतु सलग पडणाऱ्या पावसामुळे हा दिलासा दिला जात असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु पावसाने पाठ फिरविल्यास पुन्हा पाणी कपात करावी लागेल असेही पालिकेने स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी