शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Thane: मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ५० हजारांच्या अनुदानासाठी ठाणे-पालघरचे २५ हजार शेतकरी पात्र

By सुरेश लोखंडे | Updated: August 7, 2022 18:08 IST

Thane: शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषित केले आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे -  शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषीत केले आहे. त्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील तब्बल २४ हजार ९०२ शेतकरी पात्र ठरत असल्याचे उघड झाले आहे.

आधीच्या सरकारने थकबाकीदार शेतकºयांचे कर्ज माफ करून त्यांना कर्जमुक्त केले आहे. मात्र सतत व नियमित कर्ज भरूनही त्या शेतकºयांना सरकारने प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी तीन वर्षे कर्ज फेडीची अट घातली होती. त्यामुळे शेतकरी नाराज होते. त्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करीत शेतकºयांच्या हितासाठी शिंदे सरकारने तीन पैकी दोन वर्षे नियमित कर्ज फेड करणाºया शेतकºयांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषीत केले आहे. त्यास अनुसरून पात्र शेतकºयांचा लेखाजोखा तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ठाणे व पालघर जिलहह्यातील २५ हजार शेतकरी या अनुदानाचे लाभार्थी ठरणार आहे.

जिल्ह्यातील २०१९ मधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेले आणि नैसिर्गक आपतीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पण नियमति कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांनाही ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय या शिंदे सरकारने महिन्याभरापूर्वी घेतला आहे. या अनुदानाचा लाभ राज्यभरातील तब्बल १४ लाख शेतकºयांना होणार आहे. त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ९०२ शेतकºयांचा समावेश  आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील आठ हजार ९७१ आणि पालघर जिल्ह्यातील १५ हजार ९०२ शेतकºयांचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

नियमति कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर ५० हजार रु पये अनुदान मिळवण्यासाठी २०१७ पासून तीन वर्षे नियमित कर्जफेड केलेली असावी, अशी अट आधीच्या सरकारने ठेवलेली होती. आता या सरकारने तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत कर्जाची नियमित पूर्ण परतफेड केली असेल तरीही अनुदान देण्याचे घोषीत केले आहे.  यादरम्यान एखादा शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केले असल्यास त्या वारसालासुद्धा या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यातील तीन वर्षांचे खातेदार व त्यातील पात्र शेतकरी खालीलप्रमाणे.

ठाणे जिल्हा-वर्षे- खातेदार- पात्र शेतकरी२०१७-१८ - ९७४३- ८३५९२०१८-१९ - ११४२५ - ९६३८२०१९-२० - १०६१५- ८९७१

पालघर जिल्हा-वर्षे- खातेदार- पात्र शेतकरी-२०१७-१८ - १७९५३- १५०९९२०१८-१९ - २०३३४ - १६९६७२०१९-२० - १८९३४- १५९०२

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार