शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ५० हजारांच्या अनुदानासाठी ठाणे-पालघरचे २५ हजार शेतकरी पात्र

By सुरेश लोखंडे | Updated: August 7, 2022 18:08 IST

Thane: शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषित केले आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे -  शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत ते तीन वर्षांपैकी नियमित दोन वर्षे फेड करणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषीत केले आहे. त्यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील तब्बल २४ हजार ९०२ शेतकरी पात्र ठरत असल्याचे उघड झाले आहे.

आधीच्या सरकारने थकबाकीदार शेतकºयांचे कर्ज माफ करून त्यांना कर्जमुक्त केले आहे. मात्र सतत व नियमित कर्ज भरूनही त्या शेतकºयांना सरकारने प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी तीन वर्षे कर्ज फेडीची अट घातली होती. त्यामुळे शेतकरी नाराज होते. त्याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करीत शेतकºयांच्या हितासाठी शिंदे सरकारने तीन पैकी दोन वर्षे नियमित कर्ज फेड करणाºया शेतकºयांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान घोषीत केले आहे. त्यास अनुसरून पात्र शेतकºयांचा लेखाजोखा तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ठाणे व पालघर जिलहह्यातील २५ हजार शेतकरी या अनुदानाचे लाभार्थी ठरणार आहे.

जिल्ह्यातील २०१९ मधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेले आणि नैसिर्गक आपतीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पण नियमति कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांनाही ५० हजार रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय या शिंदे सरकारने महिन्याभरापूर्वी घेतला आहे. या अनुदानाचा लाभ राज्यभरातील तब्बल १४ लाख शेतकºयांना होणार आहे. त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यातील २४ हजार ९०२ शेतकºयांचा समावेश  आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील आठ हजार ९७१ आणि पालघर जिल्ह्यातील १५ हजार ९०२ शेतकºयांचा समावेश असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

नियमति कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर ५० हजार रु पये अनुदान मिळवण्यासाठी २०१७ पासून तीन वर्षे नियमित कर्जफेड केलेली असावी, अशी अट आधीच्या सरकारने ठेवलेली होती. आता या सरकारने तीनपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत कर्जाची नियमित पूर्ण परतफेड केली असेल तरीही अनुदान देण्याचे घोषीत केले आहे.  यादरम्यान एखादा शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केले असल्यास त्या वारसालासुद्धा या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.ठाणे व पालघर जिल्ह्यातील तीन वर्षांचे खातेदार व त्यातील पात्र शेतकरी खालीलप्रमाणे.

ठाणे जिल्हा-वर्षे- खातेदार- पात्र शेतकरी२०१७-१८ - ९७४३- ८३५९२०१८-१९ - ११४२५ - ९६३८२०१९-२० - १०६१५- ८९७१

पालघर जिल्हा-वर्षे- खातेदार- पात्र शेतकरी-२०१७-१८ - १७९५३- १५०९९२०१८-१९ - २०३३४ - १६९६७२०१९-२० - १८९३४- १५९०२

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार