शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

ठाणे लोकसभेसाठी २०२ मतदानकेंद्रे क्रिटिकल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:34 IST

मतदानकेंद्रांचे लाइव्ह प्रक्षेपण; एकूण २ हजार ४५२ केंद्रे, इन कॅमेरा मतदानही होणार

ठाणे : पोलीस यंत्रणेसह निरीक्षक व निवडणूक यंत्रणांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या दोन हजार ४५२ मतदानकेंद्रांपैकी २०२ केंदे्र क्रिटिकल म्हणून घोषित केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यामुळे या मतदारकेंद्रांसाठी जादा पोलीस बळासह राज्य राखीव दलाच्या तुकड्या (एसआरपीएफ), मतदानकेंद्रांचे लाइव्ह प्रक्षेपण, मतदारांचे छायाचित्रीकरण, इन कॅमेरा मतदान आदींची खास उपाययोजना केली जाणार आहे.केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सेंटर मॅजिस्टिक आणि पोलीस यांच्यातील एकमताने ठाणे लोकसभेच्या क्रिटिकल मतदानकेंद्रांची निवड करण्यात आली. या क्रिटिकल मतदानकेंद्रांसाठी विविध निकष लावण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मतदानकेंद्रांवर गेल्या निवडणुकीत ९० टक्के मतदान झालेले असावे. यातील ७५ टक्के मतदान एकाच उमेदवारास हा निकष विचारात घेतला आहे. याप्रमाणेच मतदानकेंद्रात जास्तीतजास्त मतदारांकडे फोटो नसलेले मतदार ओळखपत्र असणे, एकाच परिवारातील मतदार एकत्र येण्याऐवजी एकेक करून (सिंगल व्होटर) मतदान केलेल्या मतदारांची संख्या जास्त असणे, रेसिडेन्सिअल मतदार जास्तीतजास्त असणे इत्यादी निकषांवर हे क्रिटिकल मतदानकेंद्र निश्चित केले आहे.यंदा निवडणुकीला फक्त ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांत २०२ क्रिटिकल मतदानकेंद्रे घोषित झाली आहेत. यामुळे कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघांत क्रिटिकल केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. ठाणे मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ही २०२ मतदानकेंद्रे ११६ ठिकाणी आहेत. यामध्ये मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघात ३४ मतदानकेंद्रे क्रिटिकल आहेत. याप्रमाणेच ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात ३५, कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ३०, ठाणे विधानसभा मतदारसंघात २७, ऐरोलीत ३७ आणि बेलापूरमध्ये ३९ मतदानकेंद्रे क्रिटिकल म्हणून घोषित केली आहेत.मुंब्रा, दिव्यातील ५९ मतदानकेंद्रे संवेदनशीलमुंब्रा : कल्याण लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाºया मुंब्रा, दिव्यात मतदानासाठी एकूण २३८ मतदानकेंद्रे आहेत. त्यापैकी ५९ केंद्रे संवेदनशील आहेत. यामध्ये मुंब्य्रातील ४७ आणि दिव्यातील १२ मतदानकेंद्रांचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला केंंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर निवडणूक अधिकाºयांच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे