शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ठाकरे बंधू एकत्र या! मुंबईनंतर आता ठाण्यातही बॅनर; शिवसैनिक-मनसैनिकाने घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 14:58 IST

सोमवारी दादरच्या शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

ठाणे – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २ दिवसांपूर्वी एक राजकीय भूकंप घडला. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. अजित पवारांसह ८ राष्ट्रवादी आमदारांनी थेट सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. या प्रकारावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमासारखा दिगू टिपणीस झाल्याची प्रतिक्रिया दिली. राज्याच्या राजकारणात वारंवार होणाऱ्या उलथापालथी पाहता आता कार्यकर्तेही त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत आहेत.

सोमवारी दादरच्या शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आता तरी एकत्र या असं या पोस्टरमध्ये कार्यकर्ता लक्ष्मण पाटील यांनी लिहिले होते. मुंबईनंतर आता ठाण्यात ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांनी एकच सूर आवळत राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

ठाणे शहरामध्ये उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्या वतीने “साहेब आता तरी एकत्र या” अशा आशयाचा बॅनर लावला आहे. महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हीच वेळ आहे. आम्हाला महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकार हवा आहे असा आशय असलेले बॅनर शहरांमध्ये तीन पेट्रोल पंपाठिकाणी लावण्यात आलेले आहेत.

मनसे नेत्याचे सूचक विधान

जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. युती होईल का नाही हे दोन्ही बाजूने ठरवले पाहिजे. राजकीय गणित कशी जुळवावी लागतात. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. ठाकरे बंधु एकत्र येतील का हे काळच ठरवेल. जनता व्यक्त होत असते. पुढे काय होईल हे आगामी काळात कळेल असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सूचक विधान केले आहे.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे