शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

ठाण्यासह नवी मुंबई आणि मुंबईतील काही भागात तात्पुरते भारनियमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 19:54 IST

हर घर मे बिजलीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. परंतु पावसाळा संपत नाही तोच ठाण्यासह, नवी मुंबई आणि मुंबईच्या काही भागात तात्पुरत्या भारनियमनाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत.

ठाणे - हर घर मे बिजलीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. परंतु पावसाळा संपत नाही तोच ठाण्यासह, नवी मुंबई आणि मुंबईच्या काही भागात तात्पुरत्या भारनियमनाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. गुरुवारपासून महावितरणने हे भारनियमन सुरू केले असून, ते केव्हा कमी होणार याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. कोळशाचे प्रमाण कमी झाल्याने हे भारनियमन करावे लागत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. परंतु यामुळे अगदी भारनियमनमुक्त भागातही तब्बल तीन तासांचे चटके सहन करावे लागत आहेत. काही भागात नऊ तास वीज गायब झाली आहे.ऑक्टोबर सुरू झाला आणि विजेची मागणी वाढू लागली आहे. त्यानुसार गुरुवारी राज्यात 17900 मेगावॉट विजेची मागणी झाली, परंतु उपलब्धता मात्र 15700 मेगावॉट विजेची होती. वीज निर्मिती केंद्रांना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज निर्मितीत घट झाल्याचेही महावितरणने सांगितले आहे. विजेची मागणी आणि उपलब्धता यात तफावत निर्माण झाल्याने राज्यात ज्या भागात सर्वाधिक वीजहानी आहे. अशा भागात ए, बी, सी, डी, ई, एफ व जी 1, जी 2 व जी 3 या गटांतील फीडर्सवर तात्पुरते भारनियमन सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.परंतु अचानकपणे आणि तेही ऑक्टोबर हीटमध्ये सुरू झालेल्या या भारनियमनाचे चटके मात्र ग्राहकांना तीव्र स्वरुपात बसू लागले आहेत. त्यानुसार ए गटातील ठाणे 1, दोन, वागळे इस्टेट आणि मुलुंड या भागात सव्वा तीन तासांचे दोन टप्यात, ग्रुप बी मध्ये पुन्हा ठाणे एक, दोन आणि तीन वा वागळे आणि मुलुंडचा काही भाग या ठिकाणी 4 तास, त्यानंतर अशा प्रकारे ग्रुप सीमध्ये पावणे पाच तास, ग्रुप डीमध्ये 5.30 तास, ईमध्ये 7 तास, जी 1 मध्ये 7.45 तास, जी 2 मध्ये 8.30 तास आणि जी 3 मध्ये तब्बल 9.15 तासांचे दोन टप्यात भारनियमन सुरू झाले आहे. त्यामुळे या भारनियमनाच्या झळा ठाण्यासह नवी मुंबई आणि भांडुप, मुलुंडच्या अनेक भागांना बसण्यास सुरू झाला आहे. आधीच ऑक्टोबर हीटच्या घामाच्या धारा आणि त्यात अचानक सुरू झालेल्या भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र चांगलाच हैराण झाला आहे.दरम्यान, या विजेच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीसाठी 1 हजार मेगावॉटची खुल्या बाजारातून विजेची खरेदी केली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून अंदाजे 7 टीएमसीपर्यंत पाणी वापरून वीज उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एनटीपीसी कंपनीला ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील पूर्व नियोजित देखभाल करीता बंद ठेवण्यात येणा-या संचास बंद न करण्याच्या सुचना दिल्या आहेत. एनटीपीसीच्या मौदा प्रकल्पातून 500 मेगावॉट व नवीन सुरु झालेल्या सोलापुर प्रकल्पातून जवळपास 300 मेगावॉट अशी 80 मेगावॉट वीज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. महावितरणने असे उपाय करण्यास सुरवात केली असली तरी देखील अचानकपणो आणि पुढे कीती दिवस हे भारनियमन सुरु राहणार याची माहिती नसल्याने त्याचा झळा मात्र सर्वसामान्यांना बसण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे लघु उद्योगांना देखील या भारनियमनाच्या झळा बसू लागल्याने त्याचा परिणाम उद्योगांना सहन करावा लागला आहे.