शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
2
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
3
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
4
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
5
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
6
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
7
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
8
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
9
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
10
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
11
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
12
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
13
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
14
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
15
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
16
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
17
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
18
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
19
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
20
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफीचा ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 06:18 IST

अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतर : ठामपाचे उत्पन्न होणार कमी

ठळक मुद्देमागील २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाणे  महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव गुरुवारी महासभेत मंजूर करण्यात आला. तब्बल साडेचार वर्षांनंतर मागील निवडणुकीच्या तोंडावर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने सत्ताधारी शिवसेनेने पाऊल टाकले आहे. महापालिकेने मंजूर केलेला ठराव राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठवला जाणार आहे. महापालिकेची सध्याची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनही राज्य शासनाने ठराव मंजूर केल्यास हा निर्णय महापालिकेकरिता आत्मघातकी ठरण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा हा केवळ चुनावी जुमला ठरेल, असे बोलले जाते.

मागील २०१७ च्या निवडणुकीच्या तोंडावर ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. मुंबईत याच आश्वासनाची यापूर्वी अंमलबजावणी झाल्यानंतर ठाण्यात विरोधी पक्षांनी टीका केली होती. निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरणार असल्याने सत्ताधाऱ्यांनी जुन्या वचनाची पूर्तता केली. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. 

गुरुवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दाखला देत, ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा, अशी मागणी केली.  सभागृह नेते अशोक वैती यांनी तसा ठराव सभागृहात मांडला. त्याला विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मंजुरी दिली. राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मार्च २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या व छोट्या घरांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या ठाणेकरांसाठी ही गोड बातमी आहे. मंजूर ठराव तयार करून अंतिम मंजुरीसाठी शिष्टमंडळ घेऊन जाईन आणि सरकारकडून त्यावर मोहोर उठवलेली आणून दाखवेन, असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

भाजपची केली कोंडीसत्ताधाऱ्यांनी अचानक हा ठराव मंजूर करून घेऊन भाजपच्या विरोधाची हवाच काढली. २१ महिन्यांनंतर होणाऱ्या महासभेत सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करण्याच्या तयारीने आलेल्या भाजप नगरसेवकांची सत्ताधाऱ्यांनी हवा काढली. त्यामुळे विरोध करायचे सोडून त्यांना या ठरावाच्या बाजूने कौतुक करावे लागले. सरकारकडून हा ठराव लवकर मंजूर करून आणून ठाणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी करताना हा निवडणुकीचा जुमला ठरू नये, असे मत भाजपच्या सदस्यांनी व्यक्त केले.

आर्थिक संकट गडद होणारकोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर परिणाम झाला आहे. सध्याच्या घडीला तिजोरीत अवघे सात कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यात मागील महिन्यात सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १०० कोटींहून अधिक बोजा पडणार आहे. शिवाय ठेकेदारांची आजही ६५० कोटींची बिले अदा करायची आहेत. तसेच पालिकेवर सुमारे चार हजार कोटींचे दायित्व आहे. त्यात आता ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा निर्णय घेतल्याने पालिकेच्या तिजोरीवर १५० ते १७५ कोटींचा बोजा पडणार आहे. सातवा वेतन आयोग आणि करमाफी यामुळे पालिकेला २७५ कोटींहून अधिक रकमेची तजवीज करावी लागेल. सरकार या सर्व परिस्थितीचा विचार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका