शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 19:48 IST

Tauktae Cyclone : आंबा, चिंच, जांभूळ, शेवगा आदी उत्पन्न देणारी अनेक झाडे पडली आहेत. जेणे करून अनेकवर्षांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे.

मीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे अचानक कोसळलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी मीरा भाईंदर शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असले तरी शासकीय मदतीपेक्षा नुकसान मोठे आहे. मीरा भाईंदर महापालिका हद्दीत उत्तन, डोंगरी, तरोडी, पाली, चौक भागात शेतकऱ्यांनी बागायती, कांदा आणि भाजीपाला लागवड केली होती. तर  घोडबंदर, चेणे आदी भागात सुद्धा आंब्याच्या बागा आहेत. चक्रीवादळाने बागायती आणि शेती पार उद्ध्वस्त करून टाकली आहे. या भागातील आंब्याला मागणी असली तरी आलेले पीक सुद्धा वादळाने हातचे गेले आहे. 

आंबा, चिंच, जांभूळ, शेवगा आदी उत्पन्न देणारी अनेक झाडे पडली आहेत. जेणे करून अनेकवर्षांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तरोडी भागातील पांढऱ्या कांद्याचे हातचे आलेले पीक तुडुंब पाणी साचल्याने कुजून गेले. भाजीपाल्यासाठी टाकलेले मांडव मोडून पडले. भाज्यांची केलेली लागवड नष्ट झाली. स्थानिक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी करायला घेतले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येकी किमान २५ हजारांची आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे वेन्सी मुनीस यांनी केली आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोडRainपाऊस