शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या गावातच टँकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 02:33 IST

जलुबाईची विहीर आटली; आश्रमशाळेला सुटी असल्याने मुलांची त्रासातून सुटका

- जनार्दन भेरेभातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस तीव्र होते आहे. येथील १४२ गावपाड्यांत टंचाईच्या झळा बसत असून या गावांमध्ये आमदारांच्या गावाचाही समावेश आहे.पेंढरघोळ हे तालुक्याचे आ. पांडुरंग बरोरा यांचे गाव. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वनविभागाच्या वतीने पाणीयोजना राबवण्यात आली आहे. कधीही न आटणाऱ्या जलुबाई या विहिरीवरून पाणीयोजना तयार करण्यात येऊन अनेक वर्षांपासून येथे पाणीपुरवठा केला जातो. तीन पाडे जवळजवळ असल्याने त्यांनादेखील पाण्याचा प्रश्न कधी भेडसावला नाही. मात्र, या गावाला पाणी पुरवण्यासाठी असलेली जलुबाईची ही विहीर यंदा आटली. परिणामी, आज या पाड्याला आटगाव, पेंढारघोळच्या सरपंच पद्मावती बरोरा यांच्या प्रयत्नाने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या विहिरींच्या वरच्या बाजूला असणारा तलावही यंदा लवकरच आटला. यामुळे परिसराला बारमाही पाणीपुरवठा केल्यानंतरही भरून राहणाºया या विहिरीने आता तळ गाठला आहे. विहीर कोरडी झाल्याने या पाड्यांना पाण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागणार आहे. या पाड्यातच आदिवासी आश्रमशाळा आहे. सध्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्याने ते घरी गेले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय टळली आहे. सातशे ते साडेसातशे लोकसंख्या असलेल्या या पाड्याला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.अखेर दुर्गापूरवासीयांना टँकरने पाणीपुरवठामुरबाड : शहापूरपाठोपाठ मुरबाड तालुक्यातही पाणीटंचाई तीव्र होते आहे. त्यातच, आठवडाभरापूर्वी तालुक्यातील दुर्गापूर येथील ‘पाण्यासाठी नववधू विहिरीवर’ गेल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि हे गाव एकदम प्रकाशझोतात आले. मुरबाड पंचायत समितीने त्याची तत्काळ दखल घेत तेथे टँकरची सुविधा उपलब्ध केल्याने दुर्गापूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.डिसेंबरपासून धसई परिसरातील कळभांड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुर्गापूर येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, तरीही दुर्गापूर गावाचा समावेश टंचाई आराखड्यात झाला नाही.मुरबाड तालुक्यातील २०७ गावांपैकी चार गावे आणि १४ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असून त्यात अजून वाढ होऊ शकते. १० गावे आणि १५ वाड्यांमध्येदेखील तीव्र स्वरूपात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता दुर्गापूर गावाला त्यात प्राधान्य दिल्याने त्या ठिकाणी दररोज दोन टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.पाऊस लवकर गेल्याने या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर तोडगा म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.- पद्मावती बरोरा, सरपंच, आटगाव-पेंढरघोळ ग्रामपंचायतकधीही न आटणारी विहीर आटल्याने पाड्यात टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करणे सुरू आहे. पुढच्या वर्षी हाच त्रास जाणवू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येईल.- भास्कर बरोरा, माजी सरपंच

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई