शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

टीव्हीवर होणाऱ्या चर्चा म्हणजे असतो मनोरंजनाचा खेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 6:41 AM

सध्याच्या प्रसारमाध्यमांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेगवेगळी बंधने येत आहेत.

ठाणे : तंत्रज्ञानामुळे आपण समाजापासून तुटत चाललो आहोत. माध्यमांमुळे आपण समाजाशी जोडलेलो आहोत, असे आपल्याला वाटत असले तरी ते खरे नाही. प्रसारमाध्यमेही कोणत्या बातमीला कसा रंग द्यायचा, हे अगोदरच ठरवतात. त्यामुळे टीव्हीवर होणाºया चर्चा हाही मनोरंजनाचा खेळ असतो, अशी परखड टीका ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केली.‘वुई नीड यू सोसायटी’तर्फे ‘प्रसार माध्यमे आणि लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर शनिवारी टाऊन हॉलमध्ये परिसंवाद झाला. त्यात ते बोलत होते. सध्याच्या प्रसारमाध्यमांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेगवेगळी बंधने येत आहेत. ती कधी व्यवसायाशी संबंधित असतात, त्यातून कधी मालकांची, कधी सरकारची, कधी लोकसंघटनांची, तर कधी विचारसरणीही असतात. ते लक्षात घेता आपण वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य बºयापैकी टिकवू शकलो आहोत. याचे स्वागत केले पाहिजे. पण टीव्ही म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावर मुख्यत: सरकारी जाहिरातींचा दबाव आहे. लोकशाहीतही प्रसारमाध्यमांवर प्रचंड दडपण असते. मोकळेपणाने विचार मांडता नाही. अनेकदा ही बंधने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पत्रकारांवपर्यंत पोचवली जातात. यात विचारसरणी हाही महत्त्वाचा भाग आहे. आता जवळपास ६० ते ७० टक्के पत्रकारांची विचारसरणी अत्यंत प्रतिगामी, सनातनी आहे. त्यांनी डावे असावे, असे नाही; परंतु त्यांनी खुले असावे. तो खुलेपणा ७० टक्के पत्रकारांमध्ये नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.माध्यमांवरचा दबाव फार सफाईने वाढत आहे. समजा, सिरियातील घडामोडींचे रिपोर्टिंग पाहिले, तर ते एम्बेडेड जर्नालिस्टने (माहितीचे हवे तसे रोपण करणाºया पत्रकारांनी) तयार केलेले प्रस्थापितांचे वार्तांकन (एस्टाब्लिशमेंट रिपोर्टिंग) असल्याचे दिसते. तेथे प्रत्यक्ष रिपोर्टिंग होतच नाही किंवा तसे चित्र येत नाही. माहितीचे हवे तसे रोपण केलेले दिसते. तशीच पद्धत सध्याच्या राजकारण्यांनी विकत घेतल्याची टीकाही त्यांनी केली. अशा स्थितीत सर्व चॅनेलपैकी ६७ टक्के चॅनेलची मालकी असलेल्या रिलायन्सचीही या सत्ताधाºयांना गरज नाही. एम्बेडेड जर्नालिझममुळे टीव्हीवरील बातम्या, चर्चा पाहण्यातही अर्थ नाही, असे मत केतकर यांनी मांडले. पण सध्याची पत्रकारिता पोखरली जात आहे आणि तिला काही प्रमाणात सध्याची राजकीय व्यवस्था जबाबदार आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.पत्रकार दीप्ती राऊत म्हणाल्या, की पत्रकारांना, वार्ताहरांना आता चुकीचे काही दिसतच नाही. जे काम सरकारचे जनसंपर्क कार्यालय करते ते काम आपले असल्याचे पत्रकारांना वाटते. पत्रकारांचे काम विरोधी पक्षाचे आहे, हे जनता, सत्ताधारीच नव्हे, तर पत्रकारही विसरले आहेत आणि हा लोकशाहीला धोका आहे. सर्व वार्ताहर, डेस्कवरची मंडळी, माध्यम संस्थांमध्ये नेतृत्त्व करणारी मंडळी ही भक्त बनली आहेत. बातमीची विश्वासार्हता, सत्यता जी आजवर पत्रकारांशी जोडलेली होती, ती सोशल मीडियामुळे पूर्ण ढासळली आहे. प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी जाऊन वार्तांकन करण्याचे प्रमाण कमी होत आहे, असे मत त्यांनी मांडले.परिसंवादाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू म्हणाले की, वृत्तपत्र आणि लोकशाहीला असलेले सामाजिक भान यात अंतर पडत आहे. होर्डिंग इक्वॅलिटीमागचे वास्तव मीडिया दाखवत नाही. प्रत्येकजण आज हुकुमशाहीचा मार्ग अवलंबत आहे. काय चुकीचे, काय खरे हे पत्रकारांना दिसत नाही. वर्तमानपत्र स्वबळावर उभे असेल, तर दबावापासून वेगळे राहता येते. त्यामुळे लोकशाहीसोबत असलेली माध्यमे ही जगवली पाहिजेत. अनेकदा टीव्हीवर दृश्ये दाखवताना वास्तव लपविले जाते. लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध जाणीवा निर्माण करण्यासाठी टीव्ही माध्यमांचा उपयोग होतो. अशा संदर्भात ट्रॅजेडी ही जाणीवांची गरज बनते, ट्रॅजेडीशिवाय तुमच्यात जाणीवा निर्माण होऊ शकत नाही, असे मत डॉ. गुरू यांनी मांडले.

टॅग्स :Mediaमाध्यमे