शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

घनकचरा व्यवस्थापनावर न्या. देवधर समितीचा वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 05:57 IST

राज्याच्या नगरविकास खात्याने स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या काटेकोर अंमलबजावणीसह राज्य हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

- नारायण जाधवठाणे  - राज्याच्या नगरविकास खात्याने स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या काटेकोर अंमलबजावणीसह राज्य हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी अमृत मिशनअंतर्गत नगरविकास विभागाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कोट्यवधींची अनुदाने देऊनही त्यांच्याकडून घनकचरा अधिनियम २०१६ ची काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे उच्च न्यायालयाने राज्यात बांधकामबंदी घातली आहे, तसेच राष्ट्रीय हरित लवादानेही कान टोचले आहेत. यामुळे आता हरित लवादाच्या निर्देशानुसार देशाच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि दिव-दमण राज्यांत घनकचरा अधिनियमानुसार कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट होते किंवा नाही, याच्या तपासणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. जे. पी. देवधर यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती स्थापन केली आहे. त्यात या सर्व राज्यांच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांचा समावेश असून ती त्या त्या राज्यांनी दरमहा पाठवलेल्या घनकचºयाच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीच्या अहवालावर वॉच ठेवणार आहे.याशिवाय, महाराष्ट्र शासनानेही राज्य शासनास त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी या संदर्भात पाठविलेल्या अहवालाच्या तपासणीसाठीही नगरविकास सचिव, पर्यावरण सचिव आणि केंद्रीय प्रदूषण मंंडळांच्या प्रतिनिधींची वेगळी राज्यस्तरीय त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामबंदी केल्यानंतर ‘लोकमत’ने राज्यातील सर्व महानगरांतील घनकचरा व्यवस्थापनाचे वस्तुस्थितीदर्शक चित्र निदर्शनास आणून राज्य शासनास जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच या समित्या स्थापन झाल्या आहेत.देवधर अन् राज्यस्तरीय समितीची कार्यकक्षान्या. देवधर समिती प्रत्येक राज्य आणि हरित लवादाशी समन्वय साधून घनकचरा अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण सूचना करणार आहे. शिवाय, प्रत्येक राज्यातील रेल्वे व बसस्थानकांसह अन्य गर्दीच्या ठिकाणच्या स्वच्छतेसह बायोमेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीबाबत दक्षता घेणार आहे.तर, राज्यस्तरीय समितीस सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाठविलेल्या अहवालाचा अभ्यास करून सूचना करणे, महिन्यातून एकदा त्यांच्याशी संपर्क साधणे, केंद्रीय प्रदूषण मंडळास वेळोवेळी याबाबत कळविणे, याचा अहवाल देवधर समितीस दरमहा देण्यास सांगण्यात आले आहे.घातक कचºयाची परिस्थिती गंभीरमुंबई अन् तिच्या नजीकच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर, पुणे, नागपूरसह अनेक शहरांत अद्यापही कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात नाही. एमएमआरडीएच्या २०१६-३६ च्या आराखड्यानुसार मुंबई महानगर प्रदेशात ९१ टक्के घनकचरा, आठ टक्के घातक कचरा आणि एक टक्का जैववैद्यकीय व ई-कचरा निर्माण होतो.यामध्ये बांधकामातून निर्माण होणारा कचरा १९ टक्के आहे, तर घातक कचºयापैकी ५० टक्के घातक कचरा प्रक्रि या करून पुनर्वापर करण्याजोगा आहे. मात्र, त्याची योग्य हाताळणी होत नाही. त्याचे गंभीर परिणाम प्रदेशातील पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होत आहेत. एमएमआरडीएत दरवर्षी गोळा होणाºया एकूण ३,२५,९९४ मेट्रिक टन घातक कचºयापैकी अवघ्या ९५,९८८ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रि या होत असून, सुमारे २,०३,००६ मेट्रिक टन म्हणजेच अंदाजे ७१ टक्के घातक कचºयावर प्रक्रि याच होत नाही.जाळता येण्याजोग्या १,२६,२८५ मेट्रिक टन घातक कचºयापैकी १२,१७६ एवढ्या कचºयावरच प्रक्रि या होत असून, १,१४,१०९ मेट्रिक टन कचरा प्रक्रि याविनाच पडून असतो. हा अहवाल दोन वर्षांपूर्वीची आकडेवारी सांगणारा असून, त्यात आणखी वाढ झाली आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील घनकचºयाची ही अवस्था असेल, तर राज्यातील इतर महानगरांतील समस्या काय असेल, याचा अंदाज येईल.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या