शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

घनकचरा व्यवस्थापनावर न्या. देवधर समितीचा वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 05:57 IST

राज्याच्या नगरविकास खात्याने स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या काटेकोर अंमलबजावणीसह राज्य हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

- नारायण जाधवठाणे  - राज्याच्या नगरविकास खात्याने स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या काटेकोर अंमलबजावणीसह राज्य हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी अमृत मिशनअंतर्गत नगरविकास विभागाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कोट्यवधींची अनुदाने देऊनही त्यांच्याकडून घनकचरा अधिनियम २०१६ ची काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे उच्च न्यायालयाने राज्यात बांधकामबंदी घातली आहे, तसेच राष्ट्रीय हरित लवादानेही कान टोचले आहेत. यामुळे आता हरित लवादाच्या निर्देशानुसार देशाच्या पश्चिम विभागातील महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि दिव-दमण राज्यांत घनकचरा अधिनियमानुसार कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट होते किंवा नाही, याच्या तपासणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. जे. पी. देवधर यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती स्थापन केली आहे. त्यात या सर्व राज्यांच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांचा समावेश असून ती त्या त्या राज्यांनी दरमहा पाठवलेल्या घनकचºयाच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीच्या अहवालावर वॉच ठेवणार आहे.याशिवाय, महाराष्ट्र शासनानेही राज्य शासनास त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी या संदर्भात पाठविलेल्या अहवालाच्या तपासणीसाठीही नगरविकास सचिव, पर्यावरण सचिव आणि केंद्रीय प्रदूषण मंंडळांच्या प्रतिनिधींची वेगळी राज्यस्तरीय त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने बांधकामबंदी केल्यानंतर ‘लोकमत’ने राज्यातील सर्व महानगरांतील घनकचरा व्यवस्थापनाचे वस्तुस्थितीदर्शक चित्र निदर्शनास आणून राज्य शासनास जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच या समित्या स्थापन झाल्या आहेत.देवधर अन् राज्यस्तरीय समितीची कार्यकक्षान्या. देवधर समिती प्रत्येक राज्य आणि हरित लवादाशी समन्वय साधून घनकचरा अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण सूचना करणार आहे. शिवाय, प्रत्येक राज्यातील रेल्वे व बसस्थानकांसह अन्य गर्दीच्या ठिकाणच्या स्वच्छतेसह बायोमेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीबाबत दक्षता घेणार आहे.तर, राज्यस्तरीय समितीस सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाठविलेल्या अहवालाचा अभ्यास करून सूचना करणे, महिन्यातून एकदा त्यांच्याशी संपर्क साधणे, केंद्रीय प्रदूषण मंडळास वेळोवेळी याबाबत कळविणे, याचा अहवाल देवधर समितीस दरमहा देण्यास सांगण्यात आले आहे.घातक कचºयाची परिस्थिती गंभीरमुंबई अन् तिच्या नजीकच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर, पुणे, नागपूरसह अनेक शहरांत अद्यापही कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात नाही. एमएमआरडीएच्या २०१६-३६ च्या आराखड्यानुसार मुंबई महानगर प्रदेशात ९१ टक्के घनकचरा, आठ टक्के घातक कचरा आणि एक टक्का जैववैद्यकीय व ई-कचरा निर्माण होतो.यामध्ये बांधकामातून निर्माण होणारा कचरा १९ टक्के आहे, तर घातक कचºयापैकी ५० टक्के घातक कचरा प्रक्रि या करून पुनर्वापर करण्याजोगा आहे. मात्र, त्याची योग्य हाताळणी होत नाही. त्याचे गंभीर परिणाम प्रदेशातील पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होत आहेत. एमएमआरडीएत दरवर्षी गोळा होणाºया एकूण ३,२५,९९४ मेट्रिक टन घातक कचºयापैकी अवघ्या ९५,९८८ मेट्रिक टन कचºयावर प्रक्रि या होत असून, सुमारे २,०३,००६ मेट्रिक टन म्हणजेच अंदाजे ७१ टक्के घातक कचºयावर प्रक्रि याच होत नाही.जाळता येण्याजोग्या १,२६,२८५ मेट्रिक टन घातक कचºयापैकी १२,१७६ एवढ्या कचºयावरच प्रक्रि या होत असून, १,१४,१०९ मेट्रिक टन कचरा प्रक्रि याविनाच पडून असतो. हा अहवाल दोन वर्षांपूर्वीची आकडेवारी सांगणारा असून, त्यात आणखी वाढ झाली आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील घनकचºयाची ही अवस्था असेल, तर राज्यातील इतर महानगरांतील समस्या काय असेल, याचा अंदाज येईल.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या