शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करा -आमदार नरेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 01:13 IST

उल्हास नदी व वालधुनी नदीत कारखानदार रसायनमिश्रित सांडपाणी सोडतात.

कल्याण  - उल्हास नदी व वालधुनी नदीत कारखानदार रसायनमिश्रित सांडपाणी सोडतात. उल्हास नदी पात्रातून विविध संस्था पाणी उचलतात. ४८ लाख नागरिकांची तहान उल्हास नदी भागवते. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखले नाही तर ४८ लाख नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू आहे. प्रदूषणप्रकरणी पर्यावरणमंत्री व पर्यावरण विभागाला चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी विधिमंडळात केला आहे. तसेच प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी प्रदूषणाचे पुरावेही पवार यांनी सभागृहात सादर केले आहेत.पर्यावरणमंत्र्यांनी यापूर्वी स्वत: तीन वेळा पाहणी केली आहे. तरीही प्रदूषणकारी कारखान्यांविरोधात कारवाई केली जात नाही. शहरी भागात रसायनमिश्रित पिण्याचे पाणी येते. त्याला जबाबदार कोण? पाच वर्षे हा प्रश्न सातत्याने सभागृहात उपस्थित केला जात आहे. प्रदूषण रोखण्यात एमआयडीसी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अपयशी ठरले आहे. उल्हास नदीत अक्षरक्ष: विषाचा प्रवाह वाहत आहे. वनशक्ती या पर्यावरण संस्थेने २०१३ मध्ये याप्रकरणी हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट असून प्रदूषण रोखण्यासाठी पैसा नसल्याचे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिले होते. तसेच लवादाने ठोठावलेला दंडही भरलेला नाही. सरकारने केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला. त्यानंतरही सांडपाणी केंद्राच्या कामात काही प्रगती नाही. लवादाने या संदर्भात कालबद्ध कार्यक्रम व कृती आराखडा मागितला होता. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी केलेली नाही. पर्यावरण विभागाने उल्हास नदीत जलपर्णी काढण्यावर दोन कोटी खर्च करण्याचे मान्य केले होते. ते झालेले नाही.कल्याण तालुक्यात औद्योगिक पार्क करावे : राज्यातील ५० तालुक्यांत सूक्ष्म व मध्यम व लघू औद्योगिक पार्क सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यात कल्याण पश्चिमेचा समावेश करण्यात यावा. कल्याण तालुक्यात १०० गावे आहेत. ही गावे कल्याण पश्चिमेला लागून आहेत. पत्रीपुलाचे काम लवकर मार्गी लावण्याची मागणीही केली आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत ६०० रुपये दिले जात होते. त्यात वाढ करून ते एक हजार रुपये केले आहे. त्यासाठी एकवीस हजार रुपये उत्पन्नाची मर्यादा होती. ही मर्यादा एक लाखांपर्यंत वाढविण्यात यावी, फीवाढीचे नियम न पाळणाऱ्या खाजगी शाळांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी आमदार पवार यांनी विधिमंडळात केली आहे.पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासनपर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले की, मी स्वत: प्रदूषणाची पाहणी केली आहे. प्रदूषण करणाऱ्यांसह यंत्रणांचीही झाडाझडती घेतली आहे. प्रदूषणाच्या मुद्द्यावर पुन्हा पाहणी करण्यात येईल. त्यात कोणी दोषी आढळल्यास आठ दिवसांत कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणriverनदीthaneठाणे