शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सुरेश टावरेंच्या उमेदवारीमुळे होती काँग्रेसमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 1:12 AM

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला.

- पंढरीनाथ कुंभारभिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर, झालेल्या पहिल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अबू आसीम आझमी निवडून आले होते. परंतु, ते मुंबईतील गोवंडी येथे निवडून आल्याने त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी भाजप-सेना युतीचे उमेदवार रूपेश म्हात्रे निवडून आले. त्यानंतर, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेना व भाजप युती नव्हती. तरीही, शिवसेनेचे म्हात्रे भाजप व समाजवादी पक्षाच्या उमेदवारास पराभूत करून निवडून आले. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातून समाजवादीचे उमेदवार डॉ. नुरूद्दीन अन्सारी यांना चांगली मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना केवळ ६८५ मते मिळाली. यावरून भिवंडी पूर्व मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा प्रभाव संपुष्टात आला, असे अनुमान काढता येईल.समाजवादीला मिळणारी मतेही अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला मिळालेली नाहीत. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. भिवंडी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे काँग्रेस शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांनीही या वस्तुस्थितीकडे फारसे लक्ष न देता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. मतदारसंघात काँग्रेसने सेलिब्रेटींच्या सभा घेतल्या नाहीत. परिणामी, काँग्रेसचा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील मतदान कपिल पाटील यांना मिळालेल्या मतांपेक्षा २३ हजारांनी वाढलेले दिसले, तरी अपेक्षेप्रमाणे ते कमी झाल्याचे दिसून येते. त्याउलट, या मतदारसंघातील मतदान मिळवण्यासाठी पाटील व सेनेचे म्हात्रे यांनी चांगलेच प्रयत्न केले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार म्हात्रे यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाटील यांना ४७,०१८ मते मिळाली. तर, वंचित आघाडीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत न पोहोचल्याने ३८०३ मतांवर समाधान मानावे लागले.>विधानसभेला काँग्रेसलायश मिळणे कठीणलोकसभा निवडणुकीत उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बंड पुकारले. त्याचा परिणाम होऊ न देता शिवसेनेचे आमदार व नगरसेवकांनी या मतदारसंघात चांगले काम केले. त्याप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मते मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ही जागा पुढील निवडणुकीत युतीकडे राहण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकूणच काँग्रेसला या मतदारसंघात कितपत यश मिळेल, हे काळच ठरवणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी शमणे अत्यंत गरजेचे आहे.>की फॅक्टर काय ठरला?काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षातील गटाचा विरोध असताना त्यांनी विश्वासातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून मते मिळवली.शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे यांनी विधानसभेची संधी पुन्हा मिळवण्यासाठी भाजप उमेदवार कपिल पाटील यांचे काम करत युतीधर्म टिकवला.या मतदारसंघातील काही काँग्रेस नगरसेवक व नाराज गटांनी काम न केल्याने भाजप उमेदवाराला अपेक्षेपेक्षा लीड कमी मिळाले.