शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस - सुधाकर देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 02:48 IST

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी शहर विकासाबाबत केलेली बातचीत.

- सदानंद नाईकउल्हासनगर शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. अस्वच्छ असलेले शहर स्वच्छ करण्याचा मानस असून आर्थिक स्थिरता शहराला लाभल्यास, शहराची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. त्यासाठी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून करवसुलीचा मानस नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी शहर विकासाबाबत केलेली बातचीत...उल्हासनगरासाठी व्हीजन काय आहे?शहरात असंख्य लहानमोठे उद्योग असूनही म्हणावा तसा शहराचा विकास झाला नाही. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. अर्धवट असलेली विकासकामे पूर्ण करणे, नियोजनाने शहरात विकास करण्याचा आपला मानस आहे. अर्थात, त्यासाठी सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधींसह सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील नागरिकांनी मनापासून सहकार्य केल्यास, शहर उल्हसित होण्यास मदत होईल.पाणीटंंचाई दूर कशी करणार?शहराची लोकसंख्या अधिकृतपणे सहा लाख तर वाढून सांगितल्यास सात ते आठ लाख आहे. आठ लाख लोकसंख्येला १६० एमएलडी पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होतो. तरीही, शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. पाण्याची गळती शून्यावर आणणे, बेकायदा नळजोडण्या खंडित करणे, जुन्या जलवाहिन्या बदलून नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घ्यावे लागणार आहे.अपुऱ्या अधिकाऱ्यांबाबत काय?महापालिकेत वर्ग-१ व २ च्या अधिकाºयांची तब्बल ८० टक्के पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीच्या अधिकाºयांना शासनाने नकार दिल्याने आहे त्या अधिकाºयांकडून काम करून घ्यावे लागणार आहे.बेकायदा बांधकामांचा प्रश्न निकाली कसा काढणार?शहराला बेकायदा बांधकामांचे ग्रहण लागले असून २४ जून रोजी १५ वर्षांपूर्वीची ८५५ बांधकामांची प्रकरणे व सरकारच्या अध्यादेशानुसार काय कारवाई केली आदींचा अहवाल न्यायालयाला सादर करावा लागणार आहे. बेकायदा बांधकामांची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी २००६ च्या कायद्याप्रमाणे बेकायदा बांधकामांचा प्रश्न सरकारदरबारी लावून धरावा लागेल. तरच बेकायदा बांधकामांचा प्रश्न सुटू शकेल.महापालिकेच्या उत्पन्न व खर्चात मोठी तफावत निर्माण झाली आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागणार असून खर्चात कपात करावी लागेल. पालिकेच्या आस्थापनांवरील खर्च ६५ टक्कयांवर गेल्याने, शहर विकासासाठी ३५ टक्केच निधी शिल्लक राहतो.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर