शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

सहा महिन्यापासून उपाशी असलेल्या युवकाच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:15 IST

आजच्या दगदगीच्या जीवनात आपण एवढे  व्यस्त होऊन जातो की जेवणाची वेळ सुद्धा पाळत नाही. परंतु मीरा रोड येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्नही गिळता येत नव्हते, जेवणानंतर पोटातील अन्न जसेच्या तसे परत बाहेर होते.

मीरा रोड, दि. 8 -  आजच्या दगदगीच्या जीवनात आपण एवढे  व्यस्त होऊन जातो की जेवणाची वेळ सुद्धा पाळत नाही. परंतु मीरा रोड येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्नही गिळता येत नव्हते, जेवणानंतर पोटातील अन्न जसेच्या तसे परत बाहेर होते. त्यामुळे तो फक्त पाण्यावर दिवस काढत होता. अन्ननलिकेला  'अचलसिया कार्डिया' हा दुर्मिळ आजार शोएबला असल्याचे निदान झाले. त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात मीरा रोडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरना यश आले आहे . शोएबने  या आजारावर अनेक डॉक्टरांकडून उपचार केले.  सुरुवातीला अपचन अथवा गॅसेसचा त्रास असेल म्हणून थोडे दुर्लक्षही केले. परंतु काही दिवसातच त्याचे वजन कमालीचे कमी होऊन त्याची तब्येत अजूनच खालावली. पंधरा  दिवसांपूर्वी शोएबच्या मित्राने मीरा रोड खाजगी  हॉस्पिटलमधील पोटातील आतड्यांचे शल्यविशारद डॉ. इमरान शेख यांना भेटण्यास सांगितले, असता डॉ. इमरान शेख यांनी सर्व तपासण्या केल्यावर त्याच्या अन्ननलिकेला 'अचलसिया कार्डिया' हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान केले. याविषयी अधिक माहिती देताना एचपीबी डॉ. इमरान शेख म्हणाले, "आपण जे अन्न खातो, ते अन्ननलिकेच्या मार्फत जठरामध्ये जाते. अन्ननलिका व जठराच्या मध्ये एक गोलाकार रींग असते.  ही रींग खाल्लेले अन्न हळू हळू आपल्या जठरात सोडत असते. या दुर्मिळ आजारात ही रिंग आकुंचन पावून अन्ननलिका व जठराचा दुवा बंद करते. या रींगमुळे दुहेरी फायदा असा असतो की आपण खाल्लेले अन्न हळू हळू जठरात जाते व जठरातून ते परत अन्ननलिकेत येत नाही. शोएबच्या केसमध्ये ही रींग पूर्णपणे आकुंचन पावून बंद झाली होती त्यामुळे आम्हाला कार्डीओमायोटोमी व फंडोप्लिकेशन करावे लागले. यामध्ये लॅप्रोस्कॉपीच्या मदतीने आम्ही या रिंगचा आकार मोठा केला व त्याचबरोबर जठराचा आकारही थोडा कमी केला जेणेकरून  खाल्लेले  अन्न सुलभरीत्या जठरात जाऊ शकेल व ते जठरातून परत येणार नाही. या शस्त्रक्रियेची जमेची बाजू म्हणजे पेशंट दोन तासातच पूर्वीसारखा खाऊ पिऊ शकतो. शोएबचे वजनही गेल्या दहा दिवसात  चांगल्या प्रकारे वाढले आहे.काहीजणांना हा आजार जन्मजात असतो तर काहींना लहानपणापासून त्रास होत असतो. वयाच्या तिशीमध्ये  हा आजार जास्त  बळावतो. या आजाराविषयी अजूनही आपल्या समाजात जागरूकता आलेली नाही. अन्न बारीक करून खाणे व ते व्यवस्थितरीत्या पचवण्याचे काम आपल्या शरीरातील अनेक छोटे मोठे अवयव करीत असतात. या प्रकियेत काही खंड पडत असेल तर तात्काळ योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे मत वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी व्यक्त केले.