शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

सहा महिन्यापासून उपाशी असलेल्या युवकाच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 16:15 IST

आजच्या दगदगीच्या जीवनात आपण एवढे  व्यस्त होऊन जातो की जेवणाची वेळ सुद्धा पाळत नाही. परंतु मीरा रोड येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्नही गिळता येत नव्हते, जेवणानंतर पोटातील अन्न जसेच्या तसे परत बाहेर होते.

मीरा रोड, दि. 8 -  आजच्या दगदगीच्या जीवनात आपण एवढे  व्यस्त होऊन जातो की जेवणाची वेळ सुद्धा पाळत नाही. परंतु मीरा रोड येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय शोएबला गेली ६ महिने घासभर अन्नही गिळता येत नव्हते, जेवणानंतर पोटातील अन्न जसेच्या तसे परत बाहेर होते. त्यामुळे तो फक्त पाण्यावर दिवस काढत होता. अन्ननलिकेला  'अचलसिया कार्डिया' हा दुर्मिळ आजार शोएबला असल्याचे निदान झाले. त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात मीरा रोडच्या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरना यश आले आहे . शोएबने  या आजारावर अनेक डॉक्टरांकडून उपचार केले.  सुरुवातीला अपचन अथवा गॅसेसचा त्रास असेल म्हणून थोडे दुर्लक्षही केले. परंतु काही दिवसातच त्याचे वजन कमालीचे कमी होऊन त्याची तब्येत अजूनच खालावली. पंधरा  दिवसांपूर्वी शोएबच्या मित्राने मीरा रोड खाजगी  हॉस्पिटलमधील पोटातील आतड्यांचे शल्यविशारद डॉ. इमरान शेख यांना भेटण्यास सांगितले, असता डॉ. इमरान शेख यांनी सर्व तपासण्या केल्यावर त्याच्या अन्ननलिकेला 'अचलसिया कार्डिया' हा दुर्मिळ आजार असल्याचे निदान केले. याविषयी अधिक माहिती देताना एचपीबी डॉ. इमरान शेख म्हणाले, "आपण जे अन्न खातो, ते अन्ननलिकेच्या मार्फत जठरामध्ये जाते. अन्ननलिका व जठराच्या मध्ये एक गोलाकार रींग असते.  ही रींग खाल्लेले अन्न हळू हळू आपल्या जठरात सोडत असते. या दुर्मिळ आजारात ही रिंग आकुंचन पावून अन्ननलिका व जठराचा दुवा बंद करते. या रींगमुळे दुहेरी फायदा असा असतो की आपण खाल्लेले अन्न हळू हळू जठरात जाते व जठरातून ते परत अन्ननलिकेत येत नाही. शोएबच्या केसमध्ये ही रींग पूर्णपणे आकुंचन पावून बंद झाली होती त्यामुळे आम्हाला कार्डीओमायोटोमी व फंडोप्लिकेशन करावे लागले. यामध्ये लॅप्रोस्कॉपीच्या मदतीने आम्ही या रिंगचा आकार मोठा केला व त्याचबरोबर जठराचा आकारही थोडा कमी केला जेणेकरून  खाल्लेले  अन्न सुलभरीत्या जठरात जाऊ शकेल व ते जठरातून परत येणार नाही. या शस्त्रक्रियेची जमेची बाजू म्हणजे पेशंट दोन तासातच पूर्वीसारखा खाऊ पिऊ शकतो. शोएबचे वजनही गेल्या दहा दिवसात  चांगल्या प्रकारे वाढले आहे.काहीजणांना हा आजार जन्मजात असतो तर काहींना लहानपणापासून त्रास होत असतो. वयाच्या तिशीमध्ये  हा आजार जास्त  बळावतो. या आजाराविषयी अजूनही आपल्या समाजात जागरूकता आलेली नाही. अन्न बारीक करून खाणे व ते व्यवस्थितरीत्या पचवण्याचे काम आपल्या शरीरातील अनेक छोटे मोठे अवयव करीत असतात. या प्रकियेत काही खंड पडत असेल तर तात्काळ योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे मत वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी व्यक्त केले.