शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ऑफलाइन होणाऱ्या परीक्षेमुळे विद्यार्थी तणावात, पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 11:43 PM

कोरोनाची धास्ती : सरकारकडून आधीपासूनच संभ्रमाचे वातावरण

स्नेहा पावसकर ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा काही शहरे लाॅकडाऊनच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्याने बहुतांश परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच वर्षभर प्रत्यक्ष शाळा नसल्याने अभ्यासाची नसलेली लिंक, परीक्षेबाबतचा गोंधळ आणि आता परीक्षेसाठी बाहेर पडताना कोरोनाची धास्ती या सगळ्यांमुळे विद्यार्थी तणावात आहेत.

कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला म्हणून मागील महिन्यापासून शासनाने ९ वी ते १२ वीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू केल्या. त्यानंतर ५ वी ते ८ वीच्या शाळाही काही जिल्ह्यांत सुरू करण्यात आल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुन्हा काही जिल्ह्यांत शाळा ६ मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. 

ग्रामीण ठाणे जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळा पुन्हा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले.  मात्र आता त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमित झाले आहेत.

कोरोनाची रुग्णसंख्या परत वाढते आहे. परीक्षा एप्रिल मे महिन्यात आहे. तोपर्यंत काय स्थिती असेल माहीत नाही. मात्र, अशा धोकादायक स्थितीत मुलांना परीक्षेसाठी घराबाहेर पाठवणे तरी धोक्याचे वाटते. येत्या महिनाभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.- मंजुळा रेळे, पालक

वर्षभरात अभ्यास जसा ऑनलाइन झाला किंवा इतर काही इयत्तांच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या तसेच दहावीच्या परीक्षाही ऑनलाइन घेणे शक्य आहे का, हे शासनाने पडताळून पाहून नंतरच निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. - हिमानी सवाखंडे, पालक

बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय तसा चुकीचा नाही. मात्र, कोरोनाचे वाढते संकट पाहता त्याला पर्याय काही असेल का, हे पाहायला हवे.- माधव जिनकर, पालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे