शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अरबी समुद्रातील वादळामुळे मच्छीमारांना किनाऱ्यावर परतण्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 9:11 PM

भाईंदरच्या उत्तन भागातील अनेक बोटी मासेमारीसाठी गेल्याने त्या वादळा आधी परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

मीरारोड - हवामान खात्याने समुद्रात 31 मे ते 4 जून दरम्यान वादळाचा इशारा दिल्याने हंगामाची शेवटची मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या बोटींना परतण्यास सांगण्यात आले आहे. भाईंदरच्या उत्तन भागातील अनेक बोटी मासेमारीसाठी गेल्याने त्या वादळा आधी परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

हवामान खात्याने ठाणे , मुंबई व पालघर  आदी अरबी समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्याना 31 मे ते 4 जून या दरम्यान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वादळ व वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे . त्या अनुषंगाने मच्छीमारांना समुद्रात मासेमारी साठी जाऊ नये व जे मासेमारी साठी गेले असतील त्यांनी त्वरित परत यावे त्यासाठी मच्छीमार संस्थांना कळवण्यात आले आहे . वेळेत परंतु न शकणाऱ्या मच्छीमार बोटींनी जवळच्या बंदरात वादळ जाई पर्यंत आश्रय घ्यावा असे सांगण्यात आले आहे . मच्छीमार संस्थांनी देखील मच्छीमाराना वादळाची माहिती देऊन समुद्रात जाऊ नये तसेच गेलेल्या मच्छीमारांशी संपर्क करून परतण्यास सांगितले आहे . 

आधीच मच्छीमारांचा यंदाचा हंगाम सुरवाती पासूनच पाऊस व वादळांमुळे वाया गेला. मासेमारी कुठे नीट सुरू होईल, असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे मोठे नुकसान झाले. 31 मेपासून अशीपण मासेमारी बंद होणार आहे. पण निदान हंगामाच्या शेवटच्या फेरीत मासे मिळतील अशी आशा मच्छीमारांना होती. पण आता वादळाच्या इशाऱ्याने हंगामाचा शेवट देखील निराशाजनक ठरल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले.  यंदाचा मासेमारी हंगाम अतिशय नुकसानीचा गेला आहे. पण सरकार कडून मदत मिळाली नाही.  मच्छीमारांना कोणी वाली नाही अशीच भावना बळावली असल्याचे त्यांनी सांगितले.