शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा; आव्हाडांचा इशारा, पोलिसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:50 IST

ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व नाही, जसा आदेश येतात तसे ते वागतात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

ठाणे – मुंब्रा येथील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानं आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वत: याठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ठाकरेंसोबत संजय राऊतही असतील. उद्धव यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शाखेच्या १०० मीटर परिसरात नेते आणि कार्यकर्त्यांना बंदी असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली आहे. आता या प्रकरणात मुंब्रा कळवाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत सत्ताधारी शिवसेनेला इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व नाही, जसा आदेश येतात तसे ते वागतात. ठाकरेंचे स्वागत करायचे नाही असं पोलीस सांगतात, हे सगळं जनता बघतेय. मी पोलिसांशी बोललो होतो, स्वागताचे बॅनर फाडले गेले. मला टार्गेट करेल याचा कुणी मी विचारही करत नाही. उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात येऊ देणार नाही असं स्वत: मला डीसीपी म्हणाले होते, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा असा इशारा त्यांनी दिला.

त्याचसोबत वरिष्ठ अधिकारी आपल्या अंगावर काही घेत नाही. खालचे पोलीस मरतात. ती शाखा शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय होतं. ३ दिवसापर्यंत ही शाखा ठाकरे गटाकडे होती. विजय कदम नावाच्या शिवसैनिकाच्या नावावर सगळे चेक, बील, टॅक्स जातात. विजय कदम हा कडवट आहे. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यात आले, तेव्हा मी स्वागताला गेलोय. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय, त्यांच्या स्वागताला जाणं ही आमची संस्कृती आहे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

काय आहे जितेंद्र आव्हाडांचा आरोप?

मुंब्रा परिसरामध्ये काल रात्री बॅनर्स फाडण्यात आले. पोलीसांना सूचना देऊनही पोलीस काहीच करु शकले नाहीत. या घडामोडीत पोलीसांचाही यामध्ये हात होता. आता पोलीसांना मी ज्या गाडीतून बॅनर्स फाडणारे आले होते, त्या गाडीचा नंबर देत आहे. MH43 1278, आता बघुयात पोलीस ही गाडी शोधतात का? आणि गाडी कोण चालवत होतं याची नोंद घेतात का? आणि त्यांच्यावर कारवाई करतात का? असा निशाणा पोलिसांवर साधला.

त्याचसोबत ह्याला थांबवा, त्याला थांबवा…मुंब्रा परिसरामध्ये घबराटीचे वातावरण तयार करा. दहशतीचे वातावरण तयार करा. हे करण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे गरजेचे आहे ते पोलिसांनी करावं. ती गाडी कोणाची आहे याचा आता शोध घ्या असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना केले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसShiv Senaशिवसेना