शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा; आव्हाडांचा इशारा, पोलिसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:50 IST

ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व नाही, जसा आदेश येतात तसे ते वागतात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

ठाणे – मुंब्रा येथील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानं आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वत: याठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ठाकरेंसोबत संजय राऊतही असतील. उद्धव यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शाखेच्या १०० मीटर परिसरात नेते आणि कार्यकर्त्यांना बंदी असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली आहे. आता या प्रकरणात मुंब्रा कळवाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत सत्ताधारी शिवसेनेला इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व नाही, जसा आदेश येतात तसे ते वागतात. ठाकरेंचे स्वागत करायचे नाही असं पोलीस सांगतात, हे सगळं जनता बघतेय. मी पोलिसांशी बोललो होतो, स्वागताचे बॅनर फाडले गेले. मला टार्गेट करेल याचा कुणी मी विचारही करत नाही. उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात येऊ देणार नाही असं स्वत: मला डीसीपी म्हणाले होते, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा असा इशारा त्यांनी दिला.

त्याचसोबत वरिष्ठ अधिकारी आपल्या अंगावर काही घेत नाही. खालचे पोलीस मरतात. ती शाखा शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय होतं. ३ दिवसापर्यंत ही शाखा ठाकरे गटाकडे होती. विजय कदम नावाच्या शिवसैनिकाच्या नावावर सगळे चेक, बील, टॅक्स जातात. विजय कदम हा कडवट आहे. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यात आले, तेव्हा मी स्वागताला गेलोय. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय, त्यांच्या स्वागताला जाणं ही आमची संस्कृती आहे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

काय आहे जितेंद्र आव्हाडांचा आरोप?

मुंब्रा परिसरामध्ये काल रात्री बॅनर्स फाडण्यात आले. पोलीसांना सूचना देऊनही पोलीस काहीच करु शकले नाहीत. या घडामोडीत पोलीसांचाही यामध्ये हात होता. आता पोलीसांना मी ज्या गाडीतून बॅनर्स फाडणारे आले होते, त्या गाडीचा नंबर देत आहे. MH43 1278, आता बघुयात पोलीस ही गाडी शोधतात का? आणि गाडी कोण चालवत होतं याची नोंद घेतात का? आणि त्यांच्यावर कारवाई करतात का? असा निशाणा पोलिसांवर साधला.

त्याचसोबत ह्याला थांबवा, त्याला थांबवा…मुंब्रा परिसरामध्ये घबराटीचे वातावरण तयार करा. दहशतीचे वातावरण तयार करा. हे करण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे गरजेचे आहे ते पोलिसांनी करावं. ती गाडी कोणाची आहे याचा आता शोध घ्या असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना केले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसShiv Senaशिवसेना