शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा; आव्हाडांचा इशारा, पोलिसांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:50 IST

ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व नाही, जसा आदेश येतात तसे ते वागतात असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.

ठाणे – मुंब्रा येथील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानं आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वत: याठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ठाकरेंसोबत संजय राऊतही असतील. उद्धव यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शाखेच्या १०० मीटर परिसरात नेते आणि कार्यकर्त्यांना बंदी असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली आहे. आता या प्रकरणात मुंब्रा कळवाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत सत्ताधारी शिवसेनेला इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व नाही, जसा आदेश येतात तसे ते वागतात. ठाकरेंचे स्वागत करायचे नाही असं पोलीस सांगतात, हे सगळं जनता बघतेय. मी पोलिसांशी बोललो होतो, स्वागताचे बॅनर फाडले गेले. मला टार्गेट करेल याचा कुणी मी विचारही करत नाही. उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात येऊ देणार नाही असं स्वत: मला डीसीपी म्हणाले होते, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा असा इशारा त्यांनी दिला.

त्याचसोबत वरिष्ठ अधिकारी आपल्या अंगावर काही घेत नाही. खालचे पोलीस मरतात. ती शाखा शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय होतं. ३ दिवसापर्यंत ही शाखा ठाकरे गटाकडे होती. विजय कदम नावाच्या शिवसैनिकाच्या नावावर सगळे चेक, बील, टॅक्स जातात. विजय कदम हा कडवट आहे. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यात आले, तेव्हा मी स्वागताला गेलोय. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय, त्यांच्या स्वागताला जाणं ही आमची संस्कृती आहे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

काय आहे जितेंद्र आव्हाडांचा आरोप?

मुंब्रा परिसरामध्ये काल रात्री बॅनर्स फाडण्यात आले. पोलीसांना सूचना देऊनही पोलीस काहीच करु शकले नाहीत. या घडामोडीत पोलीसांचाही यामध्ये हात होता. आता पोलीसांना मी ज्या गाडीतून बॅनर्स फाडणारे आले होते, त्या गाडीचा नंबर देत आहे. MH43 1278, आता बघुयात पोलीस ही गाडी शोधतात का? आणि गाडी कोण चालवत होतं याची नोंद घेतात का? आणि त्यांच्यावर कारवाई करतात का? असा निशाणा पोलिसांवर साधला.

त्याचसोबत ह्याला थांबवा, त्याला थांबवा…मुंब्रा परिसरामध्ये घबराटीचे वातावरण तयार करा. दहशतीचे वातावरण तयार करा. हे करण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे गरजेचे आहे ते पोलिसांनी करावं. ती गाडी कोणाची आहे याचा आता शोध घ्या असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना केले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसShiv Senaशिवसेना