शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

रिक्षाचे स्टेअरिंग टवाळखोरांच्या हाती; कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:56 AM

दुर्घटना घडल्यास आम्ही जबाबदार नाही, संघटनेचा इशारा

कल्याण : रिक्षाचालकांची मुजोरी व मनमानी भाडेवसुलीच्या त्रासाला प्रवाशांना सामोरे जावे लागत असतानाच रिक्षाचे स्टेअरिंग अल्पवयीन टवाळखोरांच्या हाती गेल्याने त्यांचा प्रवासही धोकादायक झाला आहे. दुसरीकडे विनापरवाना रिक्षाचालवणाऱ्या या मुलांविरोधात वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने भविष्यात कोणती दुर्घटना घडली तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, असा पवित्रा येथील रिक्षाचालक-मालक असोसिएशनने घेतला आहे.

रिक्षांची वाढती संख्या पाहता परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी रिक्षा संघटनांकडून होत आहे. मात्र, तरीही परिवहन विभागाने परवाना देणे सुरूच ठेवले आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे.रिक्षा चालवणाºया चालकांकडे परवाना आणि बॅज असणे बंधनकारक आहे. परंतु, काही रिक्षाचालक बॅच आणि परवाना नसलेल्या व्यक्तींना रिक्षा चालवायला अथवा भाड्याने देत आहेत. त्यात १५ ते १६ वर्षांची मुलेही आहेत. रिक्षाचालकांसाठी बंधनकारक असलेला गणवेश घालण्याऐवजी ते बर्मुडा, हाफ पॅण्ट, टी-शर्ट अशा पेहरावात रिक्षा चालवतात. त्याचबरोबर स्टॅण्ड सोडून ते प्रवासी घेतात. त्यातील अनेक जण गुटखा, मावा, मद्यपान, चरस आणि गांजाचे व्यसनही करतात. उद्धट, उर्मट वागणूक त्याचबरोबर मनमानीपणे भाडेआकारणी ते करत असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र, त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे प्रामाणिक व्यवसाय करणारा रिक्षाचालकही बदनाम होत आहे.

दरम्यान, रविवारी कल्याणमध्ये झालेल्या रिक्षाचालक-मालक असोसिएशनच्या बैठकीत अन्य विषयांसह अल्पवयीन रिक्षाचालकांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, अब्दुल शेख हे पदाधिकारी आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिक्षा पासिंगची समस्या, प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वाभाडे आकारणे, बॅज आणि गणवेश नसणे आदी मुद्यांसह वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून अल्पवयीन रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष केले जात असल्याबाबत तीव्र नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली. अल्पवयीन टवाळखोर रिक्षाचालकांमुळे महिला प्रवाशांचा प्रवास धोक्याचा झाला असल्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

जाग येणार कधी ?एकीकडे कारवाई सुरू असल्याचा दावा आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून केला जात असलातरी आजही कल्याण असो अथवा डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील स्टॅण्डवरील चित्र पाहता बिनधास्तपणे अल्पवयीन रिक्षाचालक रिक्षा लावून भाडे घेत आहेत. मुजोरी, वादावादी असे प्रकार वारंवार त्यांच्याकडून घडत असतात. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणेला जाग येणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणीही होत आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा