शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

‘घरातच बसा’चे ठाण्यात तुणतुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:13 IST

प्रशासनाचे रडगाणे : चारपेक्षा जास्त लोक जमण्यास बंदी, जिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पास

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यात येत्या ५ आणि ८ जूनपासून कंटेनमेंट झोन वगळता अनेक ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा सरकारने केली असताना ठाणे जिल्ह्यात चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी करणारे मनाई आदेश लागू केले आहेत. अमेरिका तसेच युरोपमधील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण ठाणे जिल्ह्यापेक्षा जास्त असतानाही तेथील दैनंदिन जीवन सुरळीत करण्यात आले असताना ठाणे जिल्ह्यातील प्रशासन निर्बंध अधिक घट्ट करण्यात धन्यता मानत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई-पासशिवाय परवानगी नाही, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आंतरजिल्हा प्रवाशांकरिताही ई-पासची सक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासनाने येत्या ८ जूनपासून अनेक व्यवहारांमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केली आहे. तसेच आजपासून आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण दिवसभराची संचारबंदीही शिथिल करून रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील काही दाट वस्तीच्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असल्याचे कारण पुढे करून सरसकट ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण भागात संचारबंदी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील ज्या शहरांमधील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, तेथील व्यवहार पूर्ववत सुरू करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ अत्यावश्यक कामांसाठी म्हणजे किराणा, दूध वितरण, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संचारबंदी लागू राहणार नाही. याशिवाय, अत्यावश्यक कामांकरिता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी राहणार आहे. मुख्य बाजारपेठ येत्या ५ जूननंतर सुरू होणार असून ती समविषम तारखेनुसार एक दिवसाआड रस्त्याच्या एकाच बाजूने सुरू राहणार आहे. १ ते ३० जून या कालावधीत हा मनाई आदेश लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, स्पर्धा, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार असल्यामुळे आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत प्रवासी बसवाहतुकीस मनाई आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद राहतील. ३ जूनपासून सार्वजनिक उद्यानात व्यायाम, फिरणे, सायकलिंगला सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा राहणार आहे.केवळ अत्यावश्यक कामांसाठी १ ते ३० जून या काळात घराबाहेर पडण्यासाठी परवानगी राहणार आहे. ५ जूननंतर समविषम तारखेनुसार दुकाने बाजारपेठांमध्ये सुरू करता येतील. आंतरराज्य आणि जिल्हा प्रवासाला मात्र अजूनही पोलीस ई-पासशिवाय परवानगी दिलेली नाही.’’- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयअत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सीचालक अधिक दोन, रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहनांतूनही चालकासह तिघे, दुचाकीवर फक्त चालक यांना परवानगी दिल्याचे आदेशात म्हटले आहे.