शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भारतीय सैन्य एकतेचे मूर्तिमंत उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 12:35 AM

विलास सुतावणे यांचे मत : आतापर्यंत २१ बहादुरांना परमवीरचक्र सन्मान

ठाणे : भारतीय सैन्य हे या देशातील विविधतेतील एकता या ब्रीदवाक्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. धर्म, जात, पंथ, भाषा यापलीकडे जाऊन देशाचे ऐक्य आणि अखंडता यासाठी सशक्त सेना नेहमीच तत्पर असते. त्यांच्यासाठी भारतीय हा एकच धर्म असतो, अशा भावना सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांना सतत भेटून त्यांचा उत्साह वाढविणारे विलास सुतावणे यांनी व्यक्त केल्या.

अत्रे कट्ट्यावर बुधवारी ‘जरा याद करो कुर्बानी आणि परमवीरचक्र’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुतावणे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की, आपल्या सैन्यदलातील प्रत्येक जण स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता देशावर आलेल्या परकीय आक्रमणाला धीराने सामोरे जात असतो. माणसाच्या काही भावना नैसर्गिक असतात. जसे की, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रप्रेम हे उपजत असते. यातील राष्ट्रप्रेमाचे नाते परमवीरचक्र या पुरस्कारासाठी जोडलेले असते, असे मत त्यांनी मांडले. २४ आॅक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. भारत हा संस्थापक सदस्य होता. जागतिक शांतता हे या संयुक्त राष्ट्रसंघाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. भारतीय वायुदल आणि सैन्यदल यांचे श्रीलंकेतील तमिळ बंडखोर शोधायची मोहीम म्हणजे आॅपरेशन पवन आणि त्यात नेमके आठ महत रेजिमेंटचे रामस्वामी परमेश्वरन शहीद झाले आणि त्यांना मरणोत्तर परमवीरचक्र देण्यात आले. कारगिल युद्धात मनोज कुमार पांड्ये आणि विक्रम बात्रा या दोघांना मरणोत्तर परमवीरचक्र मिळाले, तर ग्रेनेडिअर योगेंद्रसिंग यादव आणि रायफलमॅन संजय कुमार यांना हा पुरस्कार जिवंत असताना मिळाला. १९६२ च्या चीनबरोबर झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला. तरीसुद्धा भारतीय सैन्याने खचून न जाता असामान्य शौर्य दाखविले. मेजर धनसिंग थापा, सुभेदार योगिंदर सिंग आणि मेजर शैतानसिंग यांना परमवीरचक्राने सन्मानित करण्यात आले. देशाला समृद्ध करण्यासाठी अहोरात्र परिश्रम आणि पराक्रम गाजविणाऱ्या प्रत्येक सैनिकासाठी नव्हे तर सर्व भारतीय नागरिकांसाठी असे हे २१ परमवीरचक्रविजेते नेहमीच प्रेरणादायी ठरतील, असे सुतावणे यावेळी म्हणाले.परमवीरचक्र हे युद्धातील शौर्याबद्दल देण्यात येणारे भारतातील सर्वोच्च पारितोषिक आहे. भारतरत्न पुरस्काराच्या खालोखाल दुसºया क्रमांकाचे हे मानचिन्ह आहे. १९९९ सालातील कारगिल युद्ध प्रसिद्धिमाध्यमांमुळे सर्वांच्या स्मरणात आहे. या युद्धात चार शूरवीरांना परमवीरचक्र मिळाल्याची माहिती विलास सुतावणे यांनी दिली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानthaneठाणे